जालना – नांदेड समृद्धी महामार्गाच्या कामाला नळेश्वर येथे सुरुवात झाली आहे.
जालना ते नांदेड या १७९ किमीच्या समृद्धीमहामार्गाच्या कामाला गती आली आहे. यामहामार्गासाठी नांदेड जिल्ह्यातील ११गावांमध्ये १२०० शेतकऱ्यांची १७५ हेक्टर आरक्षेत्र संपादित केले आहे. त्यापोटी शेतकऱ्यांना१९१ कोटी २४ लाखांचा मोबदला यापूर्वीदेण्यात आला
.
- नांदेड जिल्ह्यात ११ गावांमध्ये १७५ हेक्टर आरचे संपादन पूर्ण
- सध्या रेल्वेने जाण्यासाठी ४, तररस्त्याने लागतो ५ तासांचा अवधी
- जैतापूर, नाळेश्वर परिसरात भराव,सपाटीकरणाच्या कामाला गती
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाप्रमाणेच जालना ते नांदेड हा एक्स्प्रेस-वे अाहे. समृद्धी महामार्गाचा या एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून नांदेडपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर नांदेड शहराची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
एक्सप्लेनर
समृद्धी महामार्गाचा नांदेडपर्यंत विस्तारझाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातीलशेतकऱ्यांना आपला शेतमाल कमीकालावधीत मुंबईपर्यंत नेता येईल. तसेचनांदेड ते छत्रपती संभाजीनगर हे अंतरएक्स्प्रेस रेल्वेने कापण्यासाठी ४ तासांचाअवधी लागतो. मात्र, समृद्धीमहामार्गामुळे हे अंतर केवळ ३ तासांतकापणे शक्य होईल. प्रशासकीयकामकाज आणि उपचारांसाठी नांदेडहूनकमी वेळात छत्रपती संभाजीनगर गाठतायेईल. आंध्र प्रदेशातून मुंबईला होणाऱ्यामालवाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंतसोयीचा ठरेल. त्यामुळे नांदेड हेमालवाहतुकीच्या दृष्टीने भविष्यातमहत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल.
या भागात भूसंपादन
जालना- नांदेड समृद्धीमहामार्गासाठी नांदेड तालुक्यातीलजैतापूर, रहाटी बु., नाळेश्वर,पिंपळगाव कोरका, बोरगाव तेलंग,कल्हाळ, विष्णुपुरी, पांगरी,गुंडेगाव, बाभूळगाव, तुप्पा वकाकांडी या बारा गावांमधीलशेतजमिनी संपादित करण्यातआल्या आहेत.

