Uddhav Thackeray Shivtirth Rally Speech Over BMC Election 2026 | ठाकरेंचे अस्तित्व ठरवणारा अजून जन्माला आला नाही: उद्धव ठाकरेंचा घणाघात, मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा डाव उधळण्याचा निर्धार – Mumbai News



“ठाकरे संपले अशी स्वप्ने पाहणाऱ्यांनी हे समोर बसलेले जनसागर पहावे. ठाकऱ्यांचे अस्तित्व ठरवणारा अजून जन्माला यायचा आहे!” अशा कडक शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. १९ वर्षांनंतर शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्यासोबत

.

महापौर पदावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने हा वाद सुरू केला. ते ‘हिंदू महापौर’ म्हणतात आणि आम्ही ‘मराठी महापौर’ म्हणतो. देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही? असा सवाल करत त्यांनी विचारले की, आम्हाला हिंदुत्व तपासायला सांगणारे स्वतः कोण आहेत? आम्ही प्रबोधनकारांचे नातू असून आमचे हिंदुत्व आणि मराठी प्रेम रक्तात आहे. भाजप केवळ निवडणूक आली की हिंदू-मुस्लिम आणि मराठी-अमराठी असा ‘रोम्बासोम्बा’ खेळायला लागते. लाचार माकडे कधीच वाघ बनू शकत नाहीत, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला.

फडणवीसांना १ लाखांचे जाहीर चॅलेंज

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना विकासावरचे एक भाषण दाखवण्याचे आव्हान दिले होते. त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, “आम्हाला चोराचा पैसा नको. मी उलट चॅलेंज देतो की, पंतप्रधान मोदींपासून तुमच्या चेल्याचपाट्यांपर्यंत, ज्यांनी हिंदू-मुस्लिम न करता केवळ विकासावर भाषण केले आहे, असे एक तरी भाषण दाखवा. आम्ही सगळे मिळून तुम्हाला १ लाख रुपये देऊ.” भाजप हे केवळ घरे पेटवून आपल्या पोळ्या भाजणारे लोक आहेत. आपलीच माणसे आपल्यावर सोडून रक्तपात घडवून आणणे हा त्यांचा धंदा असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

गुजरातचा मुंबईवर डोळा

मुंबईच्या इतिहासाची आठवण करून देताना उद्धव ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील प्रबोधनकारांच्या योगदानाचा उल्लेख केला. “ज्या वेळी मुंबई मिळवण्यासाठी लढा सुरू होता, तेव्हा प्रबोधनकार पाच प्रमुख नेत्यांपैकी एक होते. आजही गुजरातचा मुंबईवर डोळा आहे,” असा आरोप त्यांनी केला. मोरारजी देसाई या ‘नरराक्षसाने’ १०६ हुतात्म्यांवर गोळ्या चालवण्याचे आदेश दिले होते, तोही हिंदूच होता. अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांनी हा लढा लढला. मराठी माणूस कधीही विकला जाणार नाही, हे अमर शेख यांनी तेव्हाच ठणकावून सांगितले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.

अदानीचे हित जपण्यासाठी मुंबईचे ‘बॉम्बे’ करण्याचा डाव

मुंबई अदानीच्या घशात घालण्यासाठी भाजपला महापालिका हवी असल्याचा मोठा दावा उद्धव ठाकरेंनी केला. मुंबईत सध्या सुरू असलेल्या बांधकामामुळे प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे. या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सिमेंटपैकी ७० टक्के सिमेंट हे केवळ अदानीकडून घेतले जात आहे, असे त्यांनी सांगितले. भाजपचा ‘अण्णामलाई’ मुंबईत येऊन जे बोलला, तेच भाजपच्या मनात आहे. मुंबईचे पुन्हा ‘बॉम्बे’ करणे आणि इथला मराठी टक्का संपवून शहर अदानीला देणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असल्याचा पर्दाफाश उद्धव ठाकरेंनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *