Balasaheb Thorat Slams BJP Demands Fair Pune Polls | तिजोरी जनतेच्या पैशातून तयार होते – बाळासाहेब थोरात: म्हणाले – निवडणुका निकोप झाल्यास काँग्रेसला निश्चित यश – Pune News



तिजोरी ही जनतेच्या पैशातून तयार होते. सत्तेवर येणाऱ्यांनी त्या पैशांची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभू

.

विकासाच्या नावाखाली होणारा खर्च हा पायाभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य यासाठीच व्हावा, कोणाच्या लांगूलचालनासाठी नव्हे, असे थोरात यांनी नमूद केले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर आणि सरचिटणीस प्राची दुधाने उपस्थित होते.

प्रचारात काँग्रेस आघाडीवर दिसत नसली तरी, काँग्रेस लोकांच्या मनात रुजलेली आहे. निवडणुका जर निकोप, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात झाल्या तर काँग्रेसला निश्चितच यश मिळेल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. अनेक मोठी पदे भूषवणारे नेते विविध अमिषे आणि दबावतंत्राला बळी पडून भाजपमध्ये गेले, त्यामुळे आज भाजपामध्ये काँग्रेसची विचारधारा असलेले अनेक चेहरे दिसत असून, काँग्रेसयुक्त भाजप तयार झाली आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेस हे बुडणारे जहाज नसून आत्मविश्वासाने पाण्यावर तरंगणारे जहाज आहे. सध्या पदे कमी असली तरी पक्षाची ताकद कायम आहे, असे थोरात यांनी सांगितले. पुणे महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक नसून महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे हे दाखवणारी निवडणूक आहे. राज्याच्या जडणघडणीत पुण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

निवडणूक आयोगाकडून वारंवार वेळापत्रक बदलणे, नियमांमध्ये अचानक बदल, उमेदवारांना अपील करण्यास अडथळे, अर्ज माघारीसाठी दहशत व दबावतंत्र, बिनविरोध निवडणुका या बाबी गंभीर असून त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी थोरात यांनी केली. भाजपाने सर्व नियम मोडीत काढून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकल्याचा आरोपही त्यांनी केला.

पुण्यात वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण, गुन्हेगारी आणि पाण्याची भीषण समस्या यावर सत्ताधारी ठोस भूमिका घेत नाहीत. सत्ता मिळवून भ्रष्टाचार करणे हे भाजपाचे धोरण आहे. केवळ प्रगतीच्या गप्पा मारून काहीही साध्य होणार नाही. सुसंस्कृत, विचाराधिष्ठित आणि निकोप महाराष्ट्र घडवण्यासाठी मतदारांनी आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन थोरात यांनी शेवटी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *