![]()
महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईच्या राजकीय इतिहासात आज सुवर्णक्षरांची नोंद होणार आहे. दादर येथील ऐतिहासिक शिवतीर्थावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त विराट जाही
.
मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी ही ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची वेळ अत्यंत सूचक मानली जात आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीसमोर मोठे आव्हान उभे करण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे हा ‘गेम चेंजर’ ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दोन्ही नेत्यांचे वक्तृत्व आणि त्यांच्या पाठीशी असलेली मराठी माणसाची ताकद यामुळे मुंबईतील राजकारणाला आता एक नवी दिशा मिळण्याचे संकेत मिळत आहेत. या सभेत दोन्ही नेते काय बोलणार आणि कोणावर निशाणा साधणार, याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.
राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केल्यानंतर गेल्या दोन दशकात दोन्ही भावांनी अनेक निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ही ऐतिहासिक ‘ठाकरे युती’ प्रत्यक्षात आली आहे. १९ वर्षांपूर्वी दोन्ही नेते एकाच राजकीय व्यासपीठावर शेवटचे दिसले होते. आज पुन्हा एकदा तेच दृश्य शिवतीर्थावर पाहायला मिळणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. ही सभा केवळ राजकीय नसून ती भावनिकदृष्ट्याही शिवसैनिकांसाठी आणि मनसैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
