Sanjay Raut Slams BJP as ‘Hypocritical’ Over Ambernath Political Crisis | भाजप एक नंबरचा बनचुका आणि ढोंगी: अंबरनाथ प्रकरणातून चेहरा उघडा, राऊतांची भाजपवर घणाघाती टीका, म्हणाले- ठाकरेंशिवाय मुंबई म्हणजे महाराष्ट्र पांगळा – Mumbai News



राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अंबरनाथ महापालिकेतील घडामोडींचा संदर्भ देत राऊत यांनी भाजपच्या भू

.

अंबरनाथ प्रकरणावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, भाजपने अंबरनाथमध्ये काँग्रेस-एमआयएमशी युती केल्याचा ठपका ठेवत कारवाई केल्याचे दाखवले. मात्र, काँग्रेसने संबंधित नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करताच, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्याच नगरसेवकांवर ससाण्यासारखी झडप घातली, असा आरोप त्यांनी केला. का ही धावपळ? कारण ते काँग्रेसच्या विचारांचे लोक आहेत, असा टोला लगावत राऊत यांनी भाजपची खरी भूमिका उघडी पाडली. शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेसबरोबर अप्रत्यक्ष युती केली आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

फक्त अंबरनाथच नव्हे, तर अकोटमध्येही भाजप एमआयएमच्या निलंबित लोकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. एकीकडे एमआयएमविरोधात बोलायचं आणि दुसरीकडे सत्तेसाठी त्यांच्याच मदतीने सत्ता मिळवायची, हा भाजपचा दुहेरी चेहरा असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, अशी अवस्था भाजपची असल्याचं सांगत त्यांनी पक्षाच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. भाजपला आता सत्तेसाठी चोऱ्यामाऱ्या कराव्या लागत आहेत, अशी टीका करत राऊत यांनी भाजपच्या राजकीय अधःपतनाकडे लक्ष वेधलं.

ठाकरेंशिवाय मुंबई म्हणजे महाराष्ट्र दुबळा आणि पांगळा

याचबरोबर संजय राऊत यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरही महत्त्वपूर्ण विधान केलं. ठाकरेंशिवाय मुंबई म्हणजे महाराष्ट्र दुबळा आणि पांगळा, असं ठाम मत व्यक्त करत त्यांनी ठाकरे कुटुंबाच्या नेतृत्वाचं महत्त्व अधोरेखित केलं. मुंबईच्या राजकारणात ठाकरेंची भूमिका दुर्बल करण्याचा प्रयत्न म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. एकूणच, अंबरनाथ आणि अकोटमधील घटनांचा दाखला देत भाजपचा ढोंगीपणा जनतेसमोर आला आहे, असा निष्कर्ष काढत राऊत यांनी आगामी निवडणुकांत जनताच भाजपला त्याची जागा दाखवेल, असा इशाराही दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *