![]()
डॉ.भाऊसाहेब देशमुख जेव्हा लंडनमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा त्यांना भारतातील शिक्षण व्यवस्थेचा विचार आला व त्यानुसार त्यांनी आपल्या जीवनात शिक्षण हे समाजातल्या तळागाळापर्यंत झिरपलं पाहिजे, असा विचार अंगिकारून आपले कार्य केले.
.
आकाशात भरारी घेणे हे रंगावर अवलंबून नसतं तर अंतरंगावर अवलंबून असतं असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ. रणजित गणोदे यांनी केले. गुरूदेव विद्यालय नरदोडा येथे डॉ.भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांचा जयंती उत्सव व वार्षिक उत्सव सोहळा नुकताच झाला. यावेळी उद्घाटक म्हणून प्रा.डॉ.गणोदे बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारीणी सदस्य प्राचार्य केशव गावंडे उपस्थित होते. तसचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पद्मावती तेलगोटे, उत्सव प्रमुख श्रीकृष्ण इंगळे, आजीवन सभासद केशव येवले,सरपंच विलास पोटे, शाळा समिती सदस्य विलास टाले, सुनंदा टाले,अजाब टाले,गणेश टाले, रजनी काळे, शिक्षिका संघमित्रा खंडारे,मृदुला थोरात उपस्थित होत्या. पुढे बोलतांना डॉ.गणोदे यांनी आजच्या शिक्षण व्यवस्थेवर सखोल प्रकाश टाकला.
दरम्यान अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य केशव गावंडे यांनी भाऊसाहेबांच्या कार्याची उत्तुंग झेप समाजाच्या पर्यंत कशी पोहोचली याचे विवेचन केले. त्यानुसार आजच्या शाळा वाढल्या पाहिजेत, असा मौलिक विचार उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मांडला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका पी.डी. तेलगोटे यांनी शाळेच्या विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मीळवलेल्या यशाचा व शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा मांडला. सूत्रसंचालन एम.आर.थोरात तर आभार प्रदर्शन एस.आर.इंगळे यांनी केले.
