Amol Balwadkar vs Chandrakant Patil: War of Words in Pune PMC Polls | दारोदारी फिरायची वेळ आली नसती: चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी, अमोल बालवडकरांचा खोचक हल्ला; पुण्यात प्रचाराचा जोर वाढला – Pune News



पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, प्रभाग क्रमांक 9 ही निवडणूक राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. ऐनवेळी उमेदवारी कापल्यामुळे या प्रभागात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपकडून उमेदवारी नाका

.

या प्रचारादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी मोठी भविष्यवाणी करत राजकीय वातावरण अधिक तापवले. प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपचे उमेदवार लहू बालवडकर हे केवळ विजयीच होणार नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येतील, असा दावा त्यांनी केला. आपली भविष्यवाणी नेहमी खरी ठरल्याचा उल्लेख करत, 2017 च्या निवडणुकीत मुंबईतील जागांचा अचूक अंदाज आपण आधीच वर्तवला होता, असेही त्यांनी सांगितले. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा अनेक जण मला विचारतात काय होईल, आणि मी जे सांगतो ते घडते, असे सांगत लहू बालवडकर बालेवाडीतही विक्रमी मतांनी निवडून येतील, असा ठाम विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटलांच्या या भविष्यवाणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल बालवडकर यांनी जोरदार पलटवार केला. चंद्रकांत पाटलांनी आता पोपट घेऊन फिरायला हवे, असा खोचक टोला लगावत त्यांनी भाजप नेत्यांना डिवचले. जर मला उमेदवारी दिली असती तर पाटलांवर आज दारोदारी फिरायची वेळ आली नसती, असे म्हणत त्यांनी भाजप नेतृत्वावर थेट निशाणा साधला. भाजपने ऐनवेळी आपले तिकीट कापल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत भाजपविरोधात मोर्चा उघडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, पुणे शहरातील महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांनी घेतलेली पहिली सभा ही अमोल बालवडकर यांच्या समर्थनार्थ होती, यावरून राष्ट्रवादीने त्यांना किती महत्त्व दिले आहे, हेही अधोरेखित झाले.

आपली उमेदवारी कशी कापण्यात आली, याबाबत बोलताना अमोल बालवडकर म्हणाले की, कोथरूडमधून विधानसभेची उमेदवारी मागितल्यामुळे माझ्यावर राग ठेवून महापालिकेचे तिकीट कापण्यात आले. शेवटपर्यंत तिकीट देतो म्हणून झुलवण्यात आले, असा आरोप करत त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. ज्यांनी माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणले, त्यांच्या डोळ्यात येत्या चार वर्षांत अश्रू आणूनच मी बदला घेईन, असे त्यांनी ठणकावून सांगितले. एका दादाने दीड वर्ष माझ्याविरोधात कटकारस्थान केले, पण दुसऱ्या दादाने म्हणजेच अजित पवारांनी अवघ्या दीड तासात माझा राजकीय पुनर्जन्म केला, असे म्हणत त्यांनी नव्या पक्षातील समाधान व्यक्त केले. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट आणि तीव्र लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *