![]()
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावतीत विरोधकांना चारी मुंड्या चीत करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता हे विधान केले. मनपा निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ नेहरु मैदानात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. वि
.
या सभेला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे वनमंत्री संजय राठोड, माजी मंत्री आनंदराव अडसूळ व जगदीश गुप्ता, माजी आमदार संजय रायमुलकर, कॅप्टन अभिजीत अडसूळ व ज्ञानेश्वर धाने पाटील, शिवसेना नेत्या प्रीती बंड, मोर्शीच्या नगराध्यक्ष प्रतीक्षा गुल्हाने आणि चांदूर रेल्वेच्या नगराध्यक्ष प्रियंका विश्वकर्मा उपस्थित होत्या. शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात महिला शक्तीला अभिवादन करून केली, ‘ज्यांच्या मागे महिला, त्यांचा नंबर पहिला’ असे ते म्हणाले.
शिंदे यांनी अमरावतीसाठी आपला ‘प्लॅन’ तयार असल्याचे सांगितले. त्यांनी शहरातील कचरा व्यवस्थापन, भूमिगत वीज तारा, सांडपाणी निचरा यंत्रणा आणि शुद्ध व नियमित पाणीपुरवठा या समस्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले. पावसाळ्यात वीज पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वीज तारा भूमिगत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
