Congress alleges: Modi government killed MGNREGA | काँग्रेसचा आरोप: मोदी सरकारने मनरेगाची हत्या केली: राष्ट्रीय प्रवक्ते मोहन प्रकाश म्हणाले, रोजगाराचा अधिकार हिरावला – Pune News



काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सुधारणांच्या नावाखाली लोकसभेत विधेयक मंजूर करून जगातील सर्वात मोठी रोजगार हमी योजना (मनरेगा) संपवून टाकल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे मनरेगाची ‘हत्या’ करून रोजगाराचा

.

ते पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, ज्येष्ठ नेते ॲड. अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चौधरी आणि अजित दरेकर उपस्थित होते.

मोहन प्रकाश म्हणाले की, मनरेगा हे महात्मा गांधींच्या ग्रामस्वराज्य, श्रमाची प्रतिष्ठा आणि विकेंद्रित विकासाच्या स्वप्नाचे जिवंत उदाहरण होते. मात्र, मोदी सरकारने केवळ त्याचे नावच हटवले नाही, तर १२ कोटी मजुरांच्या अधिकारांनाही निर्दयीपणे पायदळी तुडवले आहे. गेली दोन दशके मनरेगा करोडो ग्रामीण कुटुंबांसाठी जीवनवाहिनी ठरली होती.

ते पुढे म्हणाले की, मनरेगा ही शंभर टक्के सरकारद्वारे अर्थसहाय्यित योजना होती. आता मोदी सरकार ४० टक्के खर्चाचा भार राज्यांवर टाकून त्यांच्यावर सुमारे ५० हजार कोटी रुपयांहून अधिकचा बोजा टाकत आहे. यापूर्वी कधीही काम थांबवले जात नव्हते, परंतु नवीन प्रणाली दरवर्षी ठराविक काळासाठी सक्तीने रोजगार बंद करण्याची परवानगी देत आहे. यामुळे गरिबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणावर बोलताना मोहन प्रकाश म्हणाले की, बारा वर्षांनंतर काँग्रेस पक्षाला लक्ष्य करण्यासाठी मोदी सरकारने निर्माण केलेला ‘नॅशनल हेराल्ड केस’चा निर्लज्ज बागुलबुवा अपमानास्पद पराभवात संपला आहे. यामुळे मोदी-शहांचे पितळ उघडे पडले असून, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *