संभाजीनगरसह राज्यातील 13 जिल्ह्यांत थंडी परतणार:20 जानेवारीपर्यंत किमान तापमानात हळूहळू घट शक्य




राज्यात ढगाळ वातावरणामुळे काही दिवसांपासून गडप झालेली थंडी पुन्हा परतण्याची शक्यता आहे. मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करदिनापासून किमान तापमान घटेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वातावरणाची ही स्थिती १८ ते २० जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, परभणी यासह १३ जिल्ह्यांत किमान तापमान गुरुवारपासून घटण्याची शक्यता आहे. उत्तरेतील बर्फवृष्टीचा लाभ दक्षिण भारतातील केरळ तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांत जानेवारीत होणारे ईशान्य मान्सूनचे निर्गमन व त्यानंतर उत्तर भारतात पुन्हा पाऊस व बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्राला चांगल्या थंडीचा लाभ होणार आहे.- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *