Devendra Fadnavis Thane Municipal Election Campaign Mahayuti | एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान: कार्यकर्त्यांची इच्छा स्वतंत्र लढण्याची होती, पण युतीचा निर्णयच योग्य- देवेंद्र फडणवीस – Mumbai News



आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. ठाण्यात एका मुलाखतीत बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची इच्छा होती की आपण स्वतंत्र

.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना हे दोनही पक्ष बलशाली आहेत. त्यामुळे आमच्या लोकांना असे वाटत होते की आता आपले बळ वाढलेले आहे. आपण त्या ठिकाणी जास्त नगरसेवक निवडूण आणू शकतो. त्यामुळे आपण तिथे स्वतंत्रपणे लढले पाहिजे. पण मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीसाठी आग्रह धरला. आपण नव्या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांची जी शिवसेना आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत, मी आमच्या येथील टीमचे आभार मानतो की मी आणि रवींद्र चव्हाण यांनी सांगितल्यानंतर ते युतीसाठी तयार झाले. आम्ही इथे कमी जागा घेतल्या परंतु आम्ही इथे सोबत लढत आहोत. पण मला हे माहित आहे की, आमचा हा निर्णय बरोबर आहे, मुंबईतला निर्णय देखील बरोबर आहे.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही जर कल्याण डोंबिवलीचा विचार केला त्या ठिकाणीही आमची अडचण झाली होती, त्या ठिकाणी आम्ही मोठा पक्ष झालो आहोत, मजबूत पक्ष झालो आहोत, मात्र तरी देखील आम्हाला त्या ठिकाणी कमी जागा मिळाल्या. आम्हाला तिथे जास्त जागा हव्या होत्या, मात्र मागच्या वेळी शिवसेनेच्या तिथे जास्त जागा आल्या होत्या, इतरही काही नगरसेवक त्यांच्या पक्षात आले होते. त्यामुळे तिथेही आम्हाला कमी जागा घ्यावा लागल्या तशी परिस्थिती निर्माण झाली. पण रवीजींनी सर्वांना समजावून सांगितले, आणि आम्ही पडती बाजू घेतली.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख नेते

एखादी सीट जास्त निवडूण येते, कधीकधी येत नाही. मात्र केवळ पाच, दहा जास्त सीट जास्त निवडून आणायच्या आहेत, म्हणून अट्टाहास न करता जिथे जिथे एमएमआर रिजनमध्ये आम्हाला एकत्र येणे शक्य आहे, तिथे आम्ही एकत्र आलो. कार्यकर्त्यांची नेहमीच इच्छा असते, मात्र सर्व ठिकाणी परिस्थिती पाहून नेत्यांना निर्णय घ्यावा लागतो. आणि काहीही असले तरी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. बाळासाहेबांची शिवसेना ते चालवत आहेत, आणि ठाणे ही त्यांची ओळख आहे. आणि त्यांची ओळख असलेल्या ठाणे शहरात त्यांना डिस्टर्ब करावे, मग आम्ही मित्र पक्ष कसले? म्हणून आम्ही निर्णय घेतला की शिंदे साहेब म्हणतील तसे आपण करू, आम्ही आमच्या लोकांना समजावले, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ठाकरेंच्या ब्रॅंडचा आम्ही बॅंड वाजवू

राजकारणातील ‘ब्रँड’वरून सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हा एकमेव मोठा ब्रँड होता, त्यांच्याशिवाय सध्या दुसरा कोणताही ब्रँड नाही, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. तसेच, आपली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुती अत्यंत भक्कम असल्याचे सांगतानाच, आता आमच्यासमोर कोणीही स्वतःला ब्रँड म्हणून उभे केले, तरी आम्ही त्यांचा बँड वाजवू, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे बंधूंना नाव न घेता खोचक इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *