दारी सीमा भाग जमला, भिक वाढा हो मराठी, दडपशाही सहन करूनी, बोलतो मराठी, असे लिहिलेली पत्रके वाटत आणि बेळगाव निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा लिहिलेली महाराष्ट्र एकीकरण समितीची नाव असलेली टोप्या घातलेल्या सीमा भागातील मराठी
.

सीमा भागातील मराठी भाषिकांच्या घोषणाबाजीमुळे एकच गोंधळ माजला आणि सर्व माध्यम प्रतिनिधी आणि पोलिस यंत्रणा तेथे जमा झाली. एकनाथ शिंदे हे साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाच्या प्रवेशद्वारा जवळ येताच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर निनादून सोडला.

आम्हाला महाराष्ट्रात कधी घेताय? आमच्यावर अन्याय होत असतानाही आम्ही तेथे मराठी बोलतोय, किती सहन करायचे? असे सांगत भीक वाढा हो मराठी असेही या आंदोलनकर्त्यांनी म्हटले. उपमुख्यमंत्र्यांचे भाषण झाले आणि ते लगेच निघून गेले. त्यांना महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात घाई होती. मात्र येथे मराठी माणूस अन्याय सहन करूनही सीमा भागातील मराठी भाषीक मराठी बोलत आहे. त्याच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांना वेळ नव्हता अशीही प्रतिक्रिया महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

साहित्य महामंडळाच्या कार्याध्यक्षांवर बुक्का फेकणाऱ्याला सहा तारखेपर्यंत पोलिस कस्टडी
सातारा येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीचे प्रमुख व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर बुक्का टाकल्या प्रकरणी अटकेत असलेल्या संदीप जाधव यास आज सातारा येथील न्यायालयात उभे केले असता येत्या सहा जानेवारीपर्यंत पोलिस कस्टडी रिमांड देण्यात आला आहे.
जेएमएफसी न्यायमूर्ती आव्हाड यांच्यापुढे आज दुपारी संदीप जाधव यास हजर केले असता सरकारी वकीलांनी आरोपीला आठ दिवसाची पोलिस कस्टडी मागितली. साहित्य संमेलनाच्या परिसरातील या घटनेच्या वेळी तेथील सीसीटीव्ही कॅमेरे दोन दिवसापासून बंदच असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले असता न्यायाधीश यांनी त्यांना फटकारले.
संदीप जाधव यांच्या वतीने एडवोकेट पायल गाडे या काम करत आहेत त्यांनी पोलिस कस्टडीला विरोध केला आणि त्याच्याकडे कोणतेही हत्यार सापडलेले नाही किंवा अन्य काही केमिकल युक्त बुक काही नाही हा बनाव असल्याचे सांगितले.
