Sewage system in Arjun Nagar is in disrepair. | अर्जुन नगरमध्ये सांडपाणी व्यवस्थेचा बोजवारा: नाली-पाइपलाइन नाही; नागरिकांनाच करावी लागते स्वच्छता – Amravati News
![]()
अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरातील नलिनीकृष्णपुरम आणि राष्ट्रसंत कॉलनी या वसाहतींमध्ये सांडपाणी व्यवस्थेचा प्रश्न अनेक वर्षांपासून गंभीर बनला आहे. या भागातील घरांतून बाहेर पडणारे सांडपाणी वाहून नेण्यासाठी कोणतीही नियोजित उघडी नाली किंवा भूमिगत पाइप
.
साचलेल्या सांडपाण्यामुळे सर्वत्र चिखल, प्लास्टिक आणि घरगुती कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, डास आणि इतर कीटकांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि टायफॉइडसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढला आहे. लहान मुले, वृद्ध, महिला आणि आजारी व्यक्तींचे आरोग्य यामुळे थेट धोक्यात आले आहे.
स्थानिक रहिवाशांनी स्वच्छता विभाग, ड्रेनेज विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तात्पुरते उपायही न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता असून, साचलेले सांडपाणी घरांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेने तातडीने या परिसराची जबाबदारी घ्यावी, साचलेले सांडपाणी आणि कचरा पूर्णपणे हटवावा, तसेच दोन्ही वसाहतींचे सांडपाणी मुख्य नालीशी जोडण्यासाठी योग्य उघडी नाली किंवा भूमिगत ड्रेनेज (पाइपलाइन) बांधावे, अशी मागणी पुढे आली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष न दिल्यास नागरिकांना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, महानगरपालिकेने आजवर या भागात कोणतीही स्वच्छता मोहीम राबवलेली नाही. मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यात महानगरपालिका याठिकाणी सपशेल अपयशी ठरली आहे. मनपा प्रशासन या भागातील स्वच्छतेकडे नेहमीच दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना वेळोवेळी स्वतःच स्वच्छता करावी लागते.
