कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव कृष्णाभैय्या दळणर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रेणुकादास बोन्नर होते. प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेच्या संचालिका सौ. शिवानीताई दळणर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच श्री. चेतन पांडे व प्रा. सारिका पांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात कौशिकी पांडे, ऋग्वेद अपस्तंब, नेहा सुरवसे व कल्याणी टाकळकर व वैजनाथ मुरडे या नवोदित कलाकारांनी विठ्ठल भक्तीने ओतप्रोत भरलेले अभंग व भक्तीगीते सादर करून रसिकांची दाद मिळविली. चेतन पांडे (तबला), अमोल लाकडे (पखवाज) आणि मिहीर जोशी (संवादिनी) यांनी उत्कृष्ट साथसंगत करून गायनाला चार चाँद लावले.
यावेळी मान्यवरांनी ज्ञान, भक्ती आणि संस्कार यांचा संगम समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतो असे प्रतिपादन केले. याप्रसंगी प्रवास तिच्या समृद्धीचा या पुस्तकाचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.पुस्तकाच्या माध्यमातून विविध कर्तृत्ववान महिलांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्यात आला असून, डॉ . संतोष हंकारे यांनी या पुस्तकाबद्दल आपले मत मांडले.हा ग्रंथ समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
