एरंडोल तालुक्यात अवकाळी पावसामुळे 5 हजार 872 शेतकऱ्यांचा घास हिरावला, 5 हजार 686 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी‎



तालुक्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसाने शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहे. विविध महसूल मंडळात गहू, मका, ज्वारी आदी पिकांना पावसाचा मोठा फटका बसला. तालुक्यातील ५ हजार ८७२ शेतकऱ्यांचे ५ हजार ६८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंड

.

अवकाळी पावसामुळे एरंडोल महसूल मंडळातील एरंडोल, विखरण, चोरटक्की, उमरदे, मुगपाट, खडके बुद्रुक, गालापूर गावातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रिंगणगाव मंडळातील रिंगणगाव, पिंपळकोठा प्र.चा., सावदे, टाकरखेडा, वैजनाथ, दापोली, खेडी-कोढोली, वैजनाथ, टाकरखेडा, नागदुली, खर्ची, रवंजे, वरखेडी परिसरात पिके आडवी पडली आहे. कासोदा मंडळातील कासोदा, फरकांडे, उमरे, मालखेडा, जाणफळ, चढूनान खुर्द, कोठे, बांभोरी परिक्षेत्रातील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. भालगाव मंडळातील भालगाव, नंदगाव, पळासदळ, पाथरखेडा, गणेशनगर तांडा, सोनबर्डी, पिंपरी, टोळी, पिंपळकोठा गावांमध्येही प्रचंड नुकसान झाल्याची नोंद आहे. उत्राण मंडळातील निपाणी, जवखेडा, सिम या गावांमध्येही थोड्याफार प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील ६५ गावांपैकी जवळपास ५२ गावात गहू, मका, ज्वारीची पिके वाऱ्यासह पावसामुळे आडवी पडल्याची स्थिती आहे.

३० टक्के पिकांच्या नुकसानीचा अंदाज रब्बी हंगामात तालुक्यात सुमारे २५ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यापैकी तब्बल ५ हजार ६८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सुमारे ५ हजार ८७२ शेतकरी बाधित झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यातील ३० ते ३५ टक्के पिकांचे नुकसान झाल्याची स्थिती आहे. नुकसानीची पाहणी नायब तहसीलदार संजय घुले यांनी केली. पंचनामे करण्यासाठी महसूल, कृषी व पंचायत समितीचे पथक नेमण्यात आले असून पंचनामे तातडीने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार गोपाळ पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *