![]()
मुलांमध्ये वणव्यासारख्या पसरलेल्या सोशल मीडिया आणि डिजिटल व्यसनाच्या गंभीर आजारावर आता राज्य सरकारने थेट शस्त्रक्रिया करण्याची तयारी केली आहे. केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालातील धोक्याचा इशारा लक्षात घेऊन, महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी या विषयावर तज्ज्ञांचा विशेष ‘टास्क फोर्स’ नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सूत्रांनी सांगितले की, फोर्सच्या अहवालावरून सोशल मीडिया वापरासाठी वयोमर्यादा ठरण्याची शक्यता आहे. शेलार यांनी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विरेंद्र सिंह यांना लेखी पत्र लिहून या संकटावर तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले आहे. या पत्रात त्यांनी ‘इंडियन सायकियाट्रिक सोसायटी’च्या धक्कादायक निष्कर्षांचा दाखला दिला आहे. त्यात म्हटले आहे की, ३५ वर्षांखालील तरुणांमध्ये मानसिक आजार वाढण्यामागे डिजिटल व्यसन हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट केले आहे. तज्ज्ञांची फौज मैदानात प्रस्तावित टास्क फोर्समध्ये केवळ सरकारी अधिकारी नसतील, तर मानसोपचारतज्ज्ञ, बालसमुपदेशक, शिक्षणतज्ज्ञ, तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांचा समावेश असेल. हा टास्क फोर्स मुलांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय निकषांचा अभ्यास करून धोरण ठरवेल. वेळ जाण्यापूर्वी घाव घालण्याची वेळ-शेलार “वेळ निघून जाण्यापूर्वी घाव घालण्याची हीच योग्य वेळ आहे. मुलांचे मानसिक आरोग्य हे केवळ खासगी संकट नसून तो सार्वजनिक सुरक्षेचा विषय आहे. महाराष्ट्रातील स्थिती 4 कोटी मुले सोशल मीडिया वापरतात (१८ वर्षांखालील)
शारीरिक आरोग्यासोबतच मुलांतील कार्यक्षमता आणि कौटुंबिक संस्कृतीवर आघात.
3 कोटी मुले सोशल मीडिया वापरतात (१५ वर्षांखालील)
५०% मानसिक विकारांची सुरुवात १८ व्या वर्षापूर्वीच
4 कोटी मुलांचे डिजिटल व्यसन रोखण्याची मोहीम:मंत्री शेलार यांचे टास्क फोर्स स्थापनेचे आदेश
