![]()
राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमुक्तीची पहिली यादी उद्या बुधवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणारा प्रोत्साहनपर लाभ आता ५० हजारांवरून थेट २ लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने योजनेची अंमलबजावणी वेगाने केली जात आहे,अशी माहिती मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. लाभार्थी संख्या, आर्थिक भार आधीचा आराखडा : पहिल्या टप्प्यात ५६ लाख शेतकरी समाविष्ट होते. त्यासाठी ३३,५८५ कोटींच्या निधीची तरतूद केली गेली होती.
नव्याने झालेली वाढ : नव्या निकषांनुसार लाभार्थींच्या संख्येत १२ लाखांची भर. राज्य तिजोरीवर ४,४०० कोटींचा अतिरिक्त भार.
सुधारित विस्तार : लाभार्थी संख्या ६८ लाखांवर. निधीचा बोजा ३७,९८५ कोटी रुपयांवर गेला आहे.
कर्जमाफीची पहिली यादी आज; 68 लाख शेतकऱ्यांना लाभ:तिजोरीवर 4,400 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा
