पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे भागवत देवसरकर यांची मागणी
नांदेड दि. 17 –
हदगाव तालुक्यातील ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी होणारी अनियोजित लोडशेडींग तात्काळ बंद करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे हदगाव तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी आज नांदेड येथे पालकमंत्री ना. अतुल सावे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी बोलताना भागवत देवसरकर म्हणाले, रात्री 7 ते 9.30 या वेळेत होणार्या लोडशेडींगमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण बुडत आहे. पावसाळ्यात रात्री वीज नसल्याने महिला वृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत. शेतकर्यांना शेतीसाठी देखील वीज मिळत नाही.
या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन एमएसईडीसीएलला सूचना देऊन ग्रामीण भागात 24 तास अखंडित वीजपुरवठा सुरु करण्याबत सकारात्मक चर्चा करून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.
यावेळी आमदार भीमराव केराम, प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर कदम कोळीकर, नगरसेवक साई बाबुलकर, गुणवंत काळे, विजय पाटील चौथमल आदी निवेदन देताना उपस्थित होते.
