![]()
“मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत, याचा अर्थ मुंबईचा महापौर कोण असावा हे दिल्लीतून आधीच ठरवण्यात आले आहे. यामध्ये केवळ भाजपच नाही, तर गौतम अदानी सुद्धा निर्णय घेणार आहेत,” अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. मुंबईकरांनी दिलेले आकडे पाहता महापौर बसवणे इतके सोपे नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मोदी आपल्या भाषणात म्हणतात की, ज्या मुंबईत काँग्रसेचा जन्म झाला, त्या मुंबईत काँग्रेसचा आम्ही पराभव केला. मोदी यांना राजकीय इतिहासाचे भान नाही. गेली किमान २५ वर्षे या मुंबईवर शिवसेनेचेच राज्य आहे. त्यामुळे काँग्रेस महाराष्ट्रात जरी असली, तर मुंबईत शिवसेना होती. तेव्हा मोदींचे भाषण लिहिणाऱ्या माणसांच्या इतिहासाचे भान कच्चे आहे, असे संजय राऊत म्हणाले. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…
आकडेवारी पाहता मुंबईत महापौर बसवणे सोपे नाही:भाजप विजयोत्सव करत असला, तरी त्यांचा विजय झालेला नाही – संजय राऊत
