![]()
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पक्षात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत. विशेषतः ज्या मंत्र्यांकडे आणि आमदारांकडे विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती, त्यांच्या सुम
.
पालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना विविध जिल्ह्यांची जबाबदारी वाटून देताना ही त्यांच्यासाठी ‘लिटमस टेस्ट’ असल्याचे संकेत दिले होते. मात्र, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर यांसारखे बालेकिल्ले वगळता इतर जिल्ह्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित यश मिळालेले नाही. आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीतही अनेक ठिकाणी नेत्यांची पकड सैल असल्याचे दिसून येत आहे. या अकार्यक्षमतेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे ‘भाकरी फिरवण्याच्या’ तयारीत असून, लवकरच काही मंत्र्यांची सुट्टी होण्याची चिन्हे आहेत.
एकनाथ शिंदेंच्या या हालचालींमुळे पालिका पातळीवरील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. स्थानिक नेत्यांची गटबांधणी आणि मंत्रिमंडळातील चेहरा-फेर यांमुळे पुढील काही आठवड्यांत राज्याच्या राजकीय वर्तुळात लक्षणीय हालचाल दिसू शकते.
गटनेते निवडीसाठी अनुभवी नावांची चर्चा
एकीकडे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात फेरबदल करणार असल्याची चर्चा असतानाच, दुसरीकडे नवनिर्वाचित नगरसेवकांची फाटाफूट टाळण्यासाठी ते स्वत: मैदानात उतरले आहेत. मुंबई महापालिकेत आज शिवसेनेच्या अधिकृत ‘गटाची’ स्थापना केली जाणार आहे. या गटनेते पदासाठी यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले यांच्यासारख्या अनुभवी आणि तरुण नावांची चर्चा सुरू आहे. आजच ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नगरसेवक फुटणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी पक्षीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे.
‘ताज’ हॉटेलमधील पॉलिटिक्स आणि सुरक्षा चक्र
नगरसेवकांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर आता त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता आणि कायदेशीर गट नोंदणी करण्यावर भर दिला जात आहे. जोपर्यंत पालिकेत सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ही ‘हॉटेल वारी’ सुरूच राहणार असल्याचे समजते. शिवसेनेच्या या हालचालींमुळे मित्रपक्ष भाजप आणि विरोधक ठाकरे गट यांच्यातही खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा…
उल्हासनगरमध्ये ‘वंचित’ला मोठा धक्का!:दोन नगरसेवकांचा शिंदे सेनेला पाठिंबा, उपमुख्यमंत्र्यांना भेटून पाठिंब्याचे पत्र सुपूर्द
उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या समीकरणांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला (VBA) मोठा धक्का बसला आहे. पक्षाकडून निवडून आलेल्या दोन्ही नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सविस्तर वाचा…
