MNS, Uddhav Sena’s 2,000-strong ‘saffron brigade’ to reach out to voters in Mumbai from 7 am – MP Sanjay Raut | दुबार मतदारांना ठाेकण्यासाठी मनसे, उद्धवसेनेची 2 हजारांची ‘भगवा ब्रिगेड’: मुंबईत सकाळी 7 वाजेपासूनच ठोकणार- खासदार संजय राऊत – Mumbai News



“दुबार, बोगस मतदाराला दिसेल तेथे बदडून काढा,’ असे आदेशच खासदार संजय राऊत आणि अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यानुसार मनसे, उद्धवसेनेने दुबार मतदारांना मारहाण करण्यासाठी २००० कार्यकर्त्यांची फौज तैनात करण्याचे जाहीर केले आहे. या फौजेला भ

.

दरम्यान, भगवा ब्रिगेडविषयी भाजपचे मंत्री आशिष शेलार म्हणाले की, मुस्लिम मतांसाठी राजकारण करणाऱ्यांना आता भगवा आठवला आहे. मुंबईतील १ लाख ६८ हजार ३५० दुबार मतदार आढळले. यापैकी ४८ हजार जणांनी आम्ही एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याचे हमीपत्र दिले. त्यामुळे सुमारे १ लाख २० हजार दुबार मतदार घोळ करण्याची शक्यता आहे. याविषयी खा. राऊत म्हणाले की, “मुंबई-ठाण्यात महायुतीचा खेळ खल्लास झाला आहे. बोगस मतदारांना रोखण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी सज्ज आहोत. दुबार मतदारांना ठोकण्याचा कार्यक्रम मतदानाच्या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासूनच सुरू होईल. अमित ठाकरे म्हणाले की, “दुबार मतदारांना आम्ही तिथल्या तिथे फोडणार.

राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर परप्रांतीयांना मुंबईत आणणाऱ्या रेल्वे बंद करू- अमित ठाकरे…

एका मूळ परदेशी वृत्तवाहिनीच्या मराठी आवृत्तीला मुलाखत देताना अमित ठाकरे म्हणाले की, मुंबईची मर्यादा आता संपली आहे. राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर परप्रांतीयांना मुंबईत आणणाऱ्या रेल्वे आम्ही बंद करून टाकू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *