![]()
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम अधिकच अटीतटीचा होत असताना, राज्याच्या राजकारणात एक अत्यंत मोठी आणि निर्णायक घडामोडी समोर आली आहे. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने अखेर अधिकृतपणे हातमिळवण
.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी बोलताना काँग्रेस आणि वंचित हे ‘नैसर्गिक मित्र’ असल्याचे नमूद केले. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लोकशाही मूल्ये जपली पाहिजेत, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका होती. याआधी नगरपरिषद निवडणुकीत काही ठिकाणी आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढलो, त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले. आज तीच भूमिका पुढे नेण्यासाठी आम्ही ‘समविचारी’ म्हणून अधिकृतपणे एकत्र आलो आहोत. विशेष म्हणजे, आज काँग्रेसच्या स्थापना दिनीच हा ऐतिहासिक युतीचा योग जुळून आल्याने एका नव्या वैचारिक अध्यायाला सुरुवात झाली आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले.
भाजपला रोखणे युतीचा मुख्य केंद्रबिंदू
जागावाटपाच्या मुद्द्यावर सध्या दोन्ही पक्षांनी ‘संयम’ पाळला असून, जागांच्या आकड्यापेक्षा विचारधारेला अधिक महत्त्व असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपला सत्तेपासून रोखणे आणि मुंबईची अस्मिता जपणे हाच या युतीचा मुख्य केंद्रबिंदू असल्याचे नेत्यांनी म्हटले. संविधानवाद्यांनी एकत्र यावे या काँग्रेसच्या आवाहनाला प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक साद दिल्यामुळे आता मुंबईतील दलित आणि बहुजन मतांचे होणारे विभाजन टळणार असल्याचे चित्र दिसत आहे. ही युती मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा मार्ग बदलणारी ठरेल, असा विश्वास राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.
भाजप-शिवसेना शिंदे गटासमोर आव्हान
या युतीमुळे मुंबईत आता महायुती, महाविकास आघाडी आणि आता ही तिसरी मोठी ताकद म्हणून समोर आलेली काँग्रेस-वंचित आघाडी यांच्यात चौरंगी संघर्ष पाहायला मिळणार आहे. आगामी काळात ही नवी आघाडी जागावाटपाचे कोणते सूत्र राबवते आणि भाजपसमोर कोणते आव्हान उभे करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
