नाशिकपाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यालादेखील बिबट्यांनी आपल्या विळख्यात घेतले आहे. जिल्ह्यातील तब्बल ९ तालुक्यांमध्ये बिबट्यांचे रोज दर्शन होत असून शहर आणि परिसरातील ४४ गावांमध्ये बिबट्याचा वावर अधिकृतपणे आढळला आहे. सध्या सुरू असलेल्या ऊसतोडणी
.
मुक्काम हलवण्याचे मुख्य कारण
नाशिक विभागाचे हेड ऑपरेशन-रेस्क्यू अभिजित महाले यांनी सांगितले की, ‘बिबट्यांचा अधिवास आता पूर्णपणे बदलला आहे. ते जंगल सोडून शेतात राहू लागले आहेत. सध्या शेतात ऊस आणि मका काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. लपण्यासाठी जागा उरली नसल्याने बिबट्या बाहेर पडत असल्याची माहिती आहे.
राज्य आपत्ती, मदतीची घोषणा
पुणे आणि नाशिकमधील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने आता वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यांना ‘राज्य आपत्ती’ घोषित केले आहे. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (संदर्भ दुरुस्ती : वनमंत्रिपदाच्या संदर्भासह) यांनी जाहीर केल्याप्रमाणे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसांना सरकारी नोकरीत सामावून घेतले जाईल.
लक्ष ठेवून आहोत, घाबरू नका- यशपाल दिलपाक, वन परिक्षेत्र अधिकारी, सिल्लोड
सिल्लोड येथील मंगरूळ गावाच्या शिवारात बिबट्याने एका वासराचा फडशा पाडला. आम्ही तातडीने तिथे पिंजरा लावला असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.
शहरात बिबट्याचा वावर नाही- सागर कुटे, वन परिक्षेत्र अधिकारी, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या तरी बिबट्याचा वावर नाही, मात्र ग्रामीण भागात दर्शन होत आहे. वन विभाग वेळोवेळी आढावा घेऊन कारवाई करत आहे.

