![]()
नगर परिषद निवडणुकीतील पराभवानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना ‘अपशकुनी’ म्हणत भुसावळमधील पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडले होते. या बोचऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसे यांनी म
.
पराभवाची जबाबदारी झटकू नका! भुसावळसह जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावरून महाजनांवर निशाणा साधताना खडसे म्हणाले की, गिरीश महाजन आपल्या सोयीनुसार बोलतात. जिल्ह्यात ज्यांनी विजयाची जबाबदारी घेतली होती, तेच आता या पराभवाला जबाबदार आहेत. मग या पराभवाचे खापर दुसऱ्यांवर का फोडता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट) रिंगणातच नसल्याने तिथे आमचा पराभव झाला असे म्हणणे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रभारी पदाबाबत केला खुलासा जळगाव महापालिका निवडणुकीच्या प्रभारी पदावरून सुरू असलेल्या चर्चांनाही खडसे यांनी पूर्णविराम दिला. संतोष चौधरी यांची प्रभारी म्हणून झालेली नियुक्ती ही आपल्याला विश्वासात घेऊनच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मी आजवर कुठल्याही निवडणुकीत प्रभारी पद स्वीकारलेले नाही. महापालिका निवडणुकीत गल्लीबोळांत फिरावे लागते, मात्र माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला ते शक्य नाही. म्हणूनच मी स्वतः हे पद नाकारले आहे, मला डावलले गेलेले नाही, असे स्पष्टीकरण खडसेंनी दिले.
जळगावात संघर्ष पेटणार आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन दिग्गज नेत्यांमधील कलह जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. महाजनांची ‘अपशकुनी’ ही टीका आणि खडसेंनी दिलेले ‘आनंदाची बाब’ हे उत्तर, यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
