Sambhajinagar Manpa Employee Dies From 33kV Wire Shock During Hoarding Removal



छत्रपती संभाजीनगर शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या एका २७ वर्षीय कर्मचाऱ्यावर आज काळाने घाला घातला. मुकुंदवाडी परिसरात कारवाई दरम्यान लोखंडी होर्डिंगचा स्पर्श ३३ केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनीला झाल्याने एका तरु

.

महानगरपालिकेकडून सध्या शहरभर अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्ज हटवण्याची मोहीम राबवली जात आहे. आज सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी येथील हनुमान मंदिर परिसरातील एक अनधिकृत होर्डिंग काढण्याचे काम सुरू होते. अमोल दिनकर जाधव (२७) आणि रवी रणधीर रिडलॉन (३८) हे दोन्ही कर्मचारी मंदिरावरील लोखंडी फ्रेम असलेले होर्डिंग उतरवत होते. होर्डिंग खाली घेत असतानाच, लोखंडी फ्रेमचा समतोल बिघडला आणि ती जवळूनच गेलेल्या ३३ केव्हीच्या हायव्होल्टेज तारेला स्पर्श झाला. प्रचंड दाबाचा वीजप्रवाह फ्रेममध्ये उतरल्याने अमोल जाधव यांना भीषण धक्का बसला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सहकाऱ्याची मृत्यूशी झुंज

या घटनेत अमोल यांचे सहकारी रवी रिडलॉन हे देखील गंभीररीत्या भाजले असून त्यांना तातडीने सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीस आणि मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर; नातेवाईकांचा आक्रोश

अवघ्या २७ वर्षांच्या अमोल जाधव यांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. “प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या मुलाचा जीव गेला,” असा आरोप करत कुटुंबीयांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला.

प्रशासकीय हलगर्जीपणावर संताप

या दुर्दैवी घटनेनंतर महापालिकेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उच्च दाबाच्या वाहिन्यांजवळ काम करताना संबंधित विभागाशी समन्वय साधून वीज पुरवठा बंद करणे आवश्यक होते, ते का झाले नाही? कर्मचाऱ्यांकडे हातमोजे, हेल्मेट किंवा इन्सुलेटेड साधने होती का? एवढ्या जोखमीच्या कामाच्या वेळी तांत्रिक जाण असलेला वरिष्ठ अधिकारी तिथे उपस्थित होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हे ही वाचा…

पोलिस भरतीला आलेल्या तरुणाचा धावताना मृत्यू:छत्रपती संभाजीनगर येथील धक्कादायक घटना; 1600 मीटर धावताना दुर्दैवी अंत

छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या पोलिस भरतीत एका 23 वर्षीय तरुणाचा 1600 मीटर धावताना मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून पोलिस होण्यासाठी आलेल्या या तरुणाचा मैदानावरच प्राण गेल्याने भरती प्रक्रियेला उपस्थित असलेल्या उमेदवारांवर शोककळा पसरली आहे. आज सकाळच्या सत्रात मैदानी चाचणी सुरू असताना ही घटना घडली. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *