बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू:65 हजार विद्यार्थ्यांची कसोटी; झेरॉक्स दुकानांना कुलूप, केंद्रांवर कॅमेऱ्यांचा पहारा; जिल्ह्यातील 159 केंद्र सज्ज




बारावीच्या परीक्षा मंगळवार (१० फेब्रुवारी) पासून सुरू होत आहे. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने उपाय योजना केल्या आहेत. याबरोबरच विभागीय शिक्षण मंडळास माध्यमिक शिक्षण विभागाने कडक नियोजन केले आहे. जिल्ह्यातील १५९ केंद्रांवर एकूण ६५ हजार ५१६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गैरप्रकारांना आळा बसावा. त्यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्राभोवती ५०० मीटरवरील सर्व झेरॉक्स केंद्र बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका फुटणे, कॉपी साहित्य पुरवठा किंवा इतर गैरप्रकारांना आळा बसावा हा निर्णय मागील मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. टोकन नंबर अन् कॅमेऱ्यांची नजर परीक्षार्थींना आत सोडवताना १ ते ५० यानुसार टोकन नंबर दिले जातील. जेणेकरून आत सोडताना कुणी तपासणी केली. त्यानंतर काही गैरप्रकार आढळल्यास कारवाईची जबादारीही निश्चित केली जाणार आहे. तसेच प्रत्येक केंद्रावरील रनर, पर्यवेक्षक यांच्या वेब कॅमेरे आणि झूम लिंकद्वारे नियंत्रण कक्षातून सर्व हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *