![]()
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ती अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा प्रभावी वापर केला जाणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबतची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध
.
या बैठकीत ‘समग्र’ संस्थेच्या वतीने आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी विशेष सादरीकरण करण्यात आले. यामध्ये शासकीय आरोग्य संस्थांचे त्यांच्या कामगिरीनुसार स्टार रेटिंग ठरवणे, नियमित आरोग्य समीक्षा करणे, आरोग्य हेल्पलाइन अधिक सक्षम करणे आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश होता. तंत्रज्ञान आणि मानवी सेवा यांचा योग्य मेळ घालून आरोग्य व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.
राज्याच्या आरोग्य विभागाला बळकट करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मांडलेल्या विविध मागण्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या बैठकीत ‘आपले गाव, आरोग्य संपन्न गाव’ योजनेची अंमलबजावणी, पॉलिएटिव्ह केअर आणि सिकलसेल नियंत्रणाबाबत चर्चा झाली. विशेषतः वैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रिया सुलभ करणे, डॉक्टरांच्या मानधनात वाढ करणे आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समावेशन प्रक्रिया गतिमान करणे, या मागण्यांवर भर देण्यात आला. तसेच प्रशासकीय सुसूत्रतेसाठी आयुष, प्रशिक्षण आणि नर्सिंग या विभागांसाठी स्वतंत्र संचालक पदे निर्माण करण्याची मागणीही करण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यामध्ये मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक व ई. रवींद्रन, तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार उपस्थित होते. याशिवाय आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, ‘समग्र’ संस्थेचे प्रतिनिधी गौरव गोयल आणि आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.
