जनजागृती उपक्रम हाती घेऊनही अपघातांच्या संख्येत वाढ:शून्य अपघात धोरण असूनही 8 वर्षांत एसटीचे अडीच हजार प्राणांतिक अपघात




“प्रवाशांच्या सेवेसाठी’ आणि “एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असे ब्रीदवाक्य असतानाही एसटी बस अपघाताची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे एसटी प्रवासाच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अपघात होऊ नये यासाठी एसटी महामंडळाकडून चालकांची आरोग्य तपासणी करणे, अपघातांबाबत जनजागृती करणे इत्यादी उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. मात्र असे असूनही अलीकडे एसटीच्या अपघातांची संख्या वाढत आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून एसटी आणि बसच्या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०१८-१९ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एस. टी. चे २,२६८ प्राणांतिक तर १०,१६० गंभीर अपघात झाले. यात प्रवासी २४८, रा. प. कर्मचारी ६५, पादचारी ५९०, इतर १,८४० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. २०१८-१९ मध्ये प्राणांतिक, गंभीर, किरकोळ अपघात मिळून ३३१०, २०१९-२० मध्ये ३३३७, २०२०-२१ मध्ये १४४५, २०२१-२२ मध्ये १२८१ अपघात झाले. एक्स्पर्ट ह्यू – प्रयत्न ताेकडे पडतात शून्य टक्के अपघात हे धोरण असले तरी अपघात हाेऊ नये यासाठीचे प्रयत्न तोकडे पडतात. किमान १५ वर्षे जूु्या व खराब गाड्या, तांत्रिक बिघाड, चालकांचे प्रशिक्षण नियमित न होणे व खराब रस्ते आदी कारणांमुळे अलीकडे एसटी बसचे अपघात वाढलेले आहे. महामंडळात सर्वसामान्यांची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरी या नव्या गाड्यांची संख्या वाढवायला हवी. चालकाला वेळोवेळी प्रशिक्षित करावे लागेल. नादुरूस्त गाड्या रस्त्यावर धावत आहे. – अजय हटेवार, राज्य उपाध्यक्ष, कामगार संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *