जनतेने बदला घेतला आणि कॉंग्रेसला घवघवीत यश दिले:चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवारांचा जल्लोष, म्हणाले- सत्ता स्थापन करण्यास अडचण नाही




राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती आघाडीवर आहे, तर काही ठिकाणी कॉंग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूरमध्ये कॉंग्रेस आघाडीवर असून जवळपास विजय निश्चित असल्याचे बोलले जात असून कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जल्लोष केला आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर महानगरपालिकेचे संपूर्ण वाटोळे केले होते, त्याचा बदला जनतेने घेतला आणि कॉंग्रेस व मित्र पक्षांना जनतेने जो पाठिंबा दिला त्याचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. चंद्रपूरवासीयांना धन्यवाद की आपण पुन्हा एकदा कॉंग्रेसवर विश्वास ठेवला आणि घवघवीत यश दिले याचे आभार व्यक्त करतो, अशा भावना वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या आहेत. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, आमची नॅचरल युती होती पप्पू देशमुख यांच्यासोबत. पप्पू देशमुख यांना धरून आमच्याकडे 3 आहेत. काही नगरसेवक ज्यांना पक्षाने तिकीट दिले नव्हते ते अपक्ष लढले, ते दोन नगरसेवक आमच्या बरोबर आहेत. आम्ही आता 32 नगरसेवक आहोत. उद्धव ठाकरे पक्षाचे 6 आहेत. इतर ही संपर्कात आहेत. 40 ते 42 पर्यंत आकडा जाईल. बहुमत मिळेल. सत्ता स्थापन करण्यात अडचण येणार नाही. आमचे 16 आमदार आहेत. पण चंद्रपूर, लातूर, भिवंडी, अमरावती, अकोला येथे आम्ही चांगले यश मिळवले आहे. सत्ता, यंत्रणा, पैसे, मतदार यादीतील घोळ याविरोधात आम्ही लढलो. जनतेने या विरोधात कौल दिला आहे. आम्हाला जनतेने पाठिंबा दिला काँग्रेसला चांगले यश मिळाले पुढच्या वाटचालीसाठी आम्हाला पाठबळ मिळाले, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपूरमध्ये कोणाला किती जागा? चंद्रपूर महापालिकेत एकूण 66 जागा आहेत. यात आत्तापर्यंत कॉंग्रेस + 30, भाजप + 24, शिवसेना ठाकरे गट + 06, राष्ट्रवादी + 02 तर इतरांना 04 जागा मिळाल्या आहेत. विजय वडेट्टीवारांचा डान्स करत जल्लोष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *