Sanjay Raut Attacks CM Over Hindi Imposition, Says Marathi Language Being Ignored | मुख्यमंत्र्यांचे मराठीपेक्षा हिंदीवर जास्त प्रेम: यूपी–एमपीत जाऊन निवडणूक लढवा, संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल – Mumbai News


मुख्यमंत्र्यांना एवढं हिंदीवर प्रेम असेल तर त्यांनी उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात जाऊन निवडणूक लढवावी. तिकडून मुख्यमंत्री व्हावे. त्यांना मोदी कुठेही मुख्यमंत्री करू शकतात, जम्मू काश्मीर लदाखलाही मुख्यमंत्री करु शकतात, आपल्या मुख्यमंत्र्यांनाच मराठी

.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठी संदर्भात किती खोटे बोलत आहे. काल नवी मुंबईच्या जाहीर नाम्यात भाजपने हिंदी सक्तीची करु असे सांगितले आहे. नवी मुंबईची भाषा मराठी नाही का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. नवी मुंबई हे शहर आग्री, कोळी मराठी भाषिकांनी वसवलेले शहर आहे. तो संपूर्ण भाग मराठी आहे, तिथले आमदार आमचे नसले तरी मराठी आहेत, बाहेरची काही लोकं तिथे कामधंद्यासाठी आली आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मराठीत भाषण न करणे हे अगदी चुकीचे

संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वसई-विरारला मनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आणि तिथे त्यांनी हिंदीमध्ये भाषण केले. विरारची भाषा हिंदी कधी झाली. तो मराठी माणसांचा परिसर आहे. तिथे काही बाहेरची लोकं आली असतील पण मुख्यमंत्र्यांनी मराठीत भाषण न करणे हे अगदी चुकीचे आहे. त्यांच्याकडून हिंदी लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. वसई-विरार हे चिमाजी अप्पाचे आहे फडणवीसांनी किमान पेशव्यांचा तरी मान राखायला हवा होता. चिमाजी अप्प्पाचा प्रभाव असणाऱ्या ठिकाणी तुम्ही हिंदीमध्ये भाषणे करतात? अशाच प्रकारे मुंबई महाराष्ट्रबाहेर काढण्याचे यांचे कारस्थान हे यशस्वी करत आहेत.

आमचे राज्यकर्ते षंढ

संजय राऊत म्हणाले की, अण्णामलई काल म्हणाला आमच्या तोंडात बॉम्बे बसले आहे, अरे भ..व्या तुझ्या तोंडात जर ते बसले आहे तर जा ना चैन्नईला इथे कशाला आहे. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांच्या भावनांशी खेळत आहेत. याचा एकही सत्ताधारी निषेध व्यक्त करत नाही. त्याला कोण ओळखते, त्यांच्या राज्यातही त्याला कुणी ओळखत नाही. तो मराठी माणसांना इथे येऊन आव्हान देतो. तू तिकडे जाऊन बोल की चैन्नई तुमचे नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे. तिथे बोलण्याची काही हिंमत नाही यांच्यामध्ये. आमचे राज्यकर्ते हे षंढ आणि गां.. आहे.

बॉम्बे नाही तर मुंबई म्हणावे लागेल

संजय राऊत म्हणाले की, भाजपचे आमदार हे अण्णामलाईची बाजू कशी घेऊ शकतात.तुम्हाला मराठी माणसानेही मतदान केले आहे ना? तुम्हाला बॉम्बे नाही तर मुंबई म्हणावे लागेल. रवींद्र चव्हाण यांना पुढच्या वेळी केरळ किंवा तामिळनाडूमध्ये निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे त्यांनी लुंगी घालून प्रचार सुरू केला आहे. ही लोकं मराठी माणसांना ग्राह्य धरत आहेत. या लोकांचे मानसिक संतूलन बिघडले आहे. भाजपमधील मराठी माणसांनी आमच्यासोबत एकत्र आले पाहिजे. मराठी अस्मिता जिवंत असणाऱ्यांनी अण्णामलाईच्या मागे उभे न राहता मनसे-शिवसेनेसोबत यावे. राज ठाकरे यांच्याकडे ही लोकं अनेक वेळा गेली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *