![]()
द्वारका शारदा पीठाधीश्वर श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज यांनी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरा’ची वाढती प्रकरणे भारतीय संस्कृती, सनातन धर्म आणि हिंदुस्थानला कमकुवत करण्याचे एक नियोजित षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या संकटा
.
शंकराचार्यांनी पुणे येथे वेदाचार्य घैसासगुरुजी वेदपाठशाळेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात भागवत कथेचे निरूपण केले. याप्रसंगी ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’च्या अधिवक्त्यांनी त्यांची भेट घेतली.
शंकराचार्यांनी स्पष्ट केले की, धर्मांतर आणि लव्ह जिहाद केवळ धार्मिक नसून राजकीय वर्चस्व मिळवण्याची दूरगामी योजना आहे. लोकशाहीत बहुमत हाच सत्तेचा आधार असल्याने, हिंदूंची संख्या कमी करून स्वतःची लोकसंख्या वाढवणे हा एक सुनियोजित कट आहे. भविष्यात मताधिकाराच्या जोरावर शासन व्यवस्था हातात घेण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
ख्रिश्चन मिशनरीसुद्धा ‘सेवे’च्या नावाखाली प्रलोभने देऊन हिंदूंचे धर्मांतर करत असल्याचे त्यांनी नमूद केले. या षड्यंत्राला आळा घालण्यासाठी शंकराचार्यांनी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने अन्य राज्यांप्रमाणे ‘लव्ह जिहाद’विरोधात कठोर कायदा करावा, अशी मागणी केली.
तसेच, अल्पसंख्याकांना त्यांच्या मदरसा आणि चर्चमध्ये धर्मशिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य असल्याप्रमाणे, शिक्षण मंत्रालयाने शासकीय व निमशासकीय शाळांमध्ये हिंदू मुलांना ‘हिंदु धर्मशिक्षण’ अनिवार्य करावे, असे विधान त्यांनी केले. शालेय जीवनापासूनच मुलांना धर्माचे आणि संस्कारांचे ज्ञान मिळाल्यास ते कोणत्याही प्रलोभनाला किंवा षड्यंत्राला बळी पडणार नाहीत, असे शंकराचार्यांनी सांगितले. त्यांनी सर्व राजकीय पक्ष, मुख्यमंत्री आणि राष्ट्रप्रेमी संस्थांना या विषयाचे गांभीर्य ओळखून एकत्र येण्याचे आवाहन केले.
