For the first time, a literary convention will be held; only 5 politicians will come due to the elections, a literary convention will be held in Satara from January 1 | प्रथमच संमेलन होणार साहित्यिकांचे; निवडणुकीमुळे 5 राजकारणीच येणार: साताऱ्यात 1 जानेवारीपासून रंगणार साहित्य संमेलन – Nashik News



साहित्यिकांच्या व्यासपीठावर राजकारण्यांचे काम काय, असा सवाल करत दरवर्षी साहित्य संमेलनांमध्ये राजकारण्यांच्या उपस्थितीला विरोध करण्यात येतो. यंदा मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे संमेलन पत्रिकेवर केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठी भाषा विभाग मंत

.

अ. भा. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने यंदाचे ९९ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन पानिपतकार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १ ते ४ जानेवारीदरम्यान साताऱ्यात होत आहे. जाहीर झालेल्या पत्रिकेत केवळ उद्घाटन समारंभाला आणि समारोपाला यंदा मंत्री दिसणार आहे. उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे दोघे तर स्वागताध्यक्ष असलेले बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रराजे भासले आणि खा. उदयनराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे असणार आहेत. तर समारोपला उपमुखमंत्री एकनाथ शिंदे आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंची उपस्थिती पत्रिकेत दाखविण्यात आली आहे.

शासनाकडून कोट्यवधींचा निधी

कराडला १९७५ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनावेळी दुर्गा भागवतांनीही राजकारण्यांना विरोध केला होता. तेव्हा यशवंतराव चव्हाण समोर प्रेक्षकांमध्ये बसले होते. त्यानंतर थेट २०२० मध्ये उस्मानाबाद येथील संमेलनातच असे चित्र दिसले. या संमेलनातही राजकारण्यांना व्यासपीठावर स्थान दिले नव्हते. नाशिक, वर्धा, दिल्लीच्या संमेलनातही मुद्दा चर्चेच आला. दिल्लीच्या संमेलनात तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महाराष्ट्रातील राजकारण्यांची मांदियाळीच होती. प्रत्येकवेळी साहित्यिकांच्या आणि महामंडळातील पदाधिकाऱ्यांच्या एका गटाने राजकारणी व्यासपीठावर आले तर लेखक, साहित्यिक झाकोळला जातो या भूमिकेतून राजकारण्यांना विरोध केला. मात्र, शासनाकडून संमेलनाला २ कोटी आणि दिल्लीतील संमेलनाला तर ४ कोटी दिले. त्यामुळे या निधीखाली दबले जाऊन महामंडळाकडून राजकारण्यांसाठी पायघड्या घातल्या.

आमचा लेखक दुय्यम ठरतो

राजकारण्यांना जेव्हा संमेलनात वा व्यासपीठावर स्थान दिले जाते तेव्हा लेखक दुय्यम ठरतो. माध्यमांमध्येही तो विचार केला जात नाही. या भूमिकेतून उस्मानाबादचे संमेलन राजकारण्यांविना करून दाखवले होते. आता निवडणुकांमध्ये या संमेलनात मंत्री, राजकारणी कमी असतील तरी ते आहेतच यातच सगळे आले. – कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद

  • गेल्या ५ संमेलनांतील राजकारण्यांची उपस्थिती : दिल्ली – २० अमळनेर – १३ वर्धा – १४ उद्गीर – ११ नाशिक – १५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *