Fadnavis Slams Uddhav Thackeray Over Ram Raksha Protest



अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कथित चोरी आणि निधी अपहाराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकाराचा तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज, रविवारी (५ जुलै)

.

ठाकरे गटाच्या या ‘रामरक्षा आंदोलना’वर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, “मला आनंद आहे की शेवटी उद्धव ठाकरे यांना प्रभू श्रीरामाची आठवण झाली आहे. आमची अपेक्षा एवढीच होती की उद्धव ठाकरे यांना प्रभू श्रीरामाची आठवण झाली पाहिजे. कारण त्यांनी प्रभू श्रीरामाचा मार्ग सोडला होता, म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. मात्र, जर ते (उद्धव ठाकरे) राममार्गाने चालले तर त्यांचे भले होईल. फक्त आजच्या दिवसांपुरती नाही, तर त्यांनी दररोज रामरक्षा म्हणावी अशी माझी अपेक्षा आहे.”

दादरमध्ये आज घुमणार ‘रामरक्षा’; बॅनर्सनी वेधले लक्ष

दरम्यान ठाकरे गटाचे हे आंदोलन आज (५ जुलै) दुपारी ४ वाजता दादर (पश्चिम) येथील ऐतिहासिक हनुमान (मारुती) मंदिरात आणि कबुतरखाना परिसरात पार पडणार आहे. ‘अब हिंदू माफ नही करेगा’ असा आक्रमक नारा देत ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती आखली आहे. या आंदोलनाचे वातावरण तापवण्यासाठी दादर प्लाझा, कबुतरखाना आणि वांद्रे येथील कलानगर (मातोश्री परिसर) परिसरात मोठे बॅनर्स झळकावण्यात आले आहेत.

हिंदू लुटारूंना त्यांची जागा दाखवून देईल – उद्धव ठाकरे

या आंदोलनाची अधिकृत घोषणा करताना उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी भाजप आणि मंदिर प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला होता. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका प्रसिद्ध वाक्याचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले होते, “अटलबिहारी वाजपेयी एकदा म्हणाले होते की ‘हिंदू मार नहीं खाएगा’. आज त्याच धर्तीवर मी सांगतोय की, ‘अब हिंदू माफ नहीं करेगा’. जे लोक राम मंदिराला लुटत आहेत, त्यांना हिंदू समाज त्यांची योग्य जागा दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही.”

“दानपेटीतील या चोरीचा जाब विचारण्यासाठी आणि निषेध नोंदवण्यासाठी आम्ही मारुती मंदिरात एकत्र येऊन रामरक्षा, हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालिसाचे पठण करणार आहोत,” असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

हे ही वाचा…

ठाकरेंचे उरलेले शिलेदारही शिंदेंच्या रडारवर:सचिन अहिरांच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरे सावध, आमदारांची बोलावली तातडीची बैठक

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर, पक्षात उरलेल्या आमदारांची मोट बांधून ठेवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (७ जुलै) संध्याकाळी ७ वाजता ‘मातोश्री’ निवासस्थानी सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *