![]()
प्रसिद्ध वऱ्हाडी विनोदी कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांना अमरावती येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद आणि मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित या सभेत पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापडकर यांनी डॉ. बेग या
.
डॉ. पापडकर म्हणाले की, डॉ. मिर्झा बेग यांनी दुःखाने भरलेल्या जगात आनंद वाटला. त्यांची आणि माझी प्रत्यक्ष भेट झाली नाही, याचे मला दुःख आहे, असेही त्यांनी नमूद केले.
ही श्रद्धांजली सभा विमलाबाई देशमुख महाविद्यालयात पार पडली. याप्रसंगी साहित्यिक डॉ. सुभाष सावरकर, प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख, संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप काळे, परफॉर्मिंग आर्टस विभागाचे प्रमुख भोजराज चौधरी, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. सतीश तराळ आणि जिल्हाध्यक्ष डॉ. राज यावलीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सभेत प्रसिद्ध वऱ्हाडी कवी डॉ. राजा धर्माधिकारी, गौतम गुडधे, राजेश महल्ले, डॉ. राज यावलीकर, राजीव शिंदे, गझलकार खलिश अनंत नांदुरकर आणि नितीन भट यांनी आपल्या कविता सादर करून डॉ. मिर्झा यांना श्रद्धांजली वाहिली. डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत, डॉ. शोभा रोकडे, प्राचार्य दिलीपसिंह खांबरे, रंजना मामर्डे, पुरुषोत्तमराव गावंडे, संजय महल्ले, वर्षा धाबे, प्रा. डॉ. राजेश मिरगे, सुनिता तायडे, शोभना देशमुख, सय्यद मुजीब, छाया पाथरे, अरविंद उतखेडे, गणेश खडके, असलम अहमद खान, चंद्रभूषण किल्लेदार, मोहम्मद अफसर, दिवाकर देशमुख, कल्पना विघे, योगिता पिंजरकर, शरद गावंडे, अश्विन चौधरी, मयूर देशमुख, प्रा. संजय खडसे, डॉ. कुमार बोबडे, माधव पांडे, रेषा अकोटकर आदींनीही श्रद्धांजली अर्पण केली.
विविध मान्यवरांनी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या कवितेचे आणि त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी लोककवी विठ्ठल वाघ आणि लोकनेते उल्हास दादा पवार यांनी शुभेच्छा पाठवल्या होत्या. श्रद्धांजली सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. सतीश तराळ यांनी केले, तर मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. मंदा नांदुरकर यांनी आभार मानले. या भावपूर्ण सभेला अमरावतीकर नागरिक, कवी आणि लेखकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
