![]()
मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मका खरेदीसाठी सेमाडोह आणि राहू येथे दोन नवीन केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, मेळघाटातील शिक्षण, आरोग्य आणि वन विभागाशी संबंधित समस्यांवरही त
.
यावर्षी मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर पायी मोर्चा काढला होता. त्यावेळी आदिवासी आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकारी आयुषी सिंह यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेऊन अमरावती येथील आदिवासी विकास अपर आयुक्त (एटीसी) कार्यालयात बैठक घेण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार, मंगळवारी अमरावती येथे ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला आदिवासी विकास, महिला व बाल विकास, जिल्हा परिषद, शिक्षण, आरोग्य, महसूल, वने, महावितरण, सहकार, पुरवठा आणि एकात्मिक बालविकास यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावर्षी मेळघाटात मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे. मात्र, किमान आधारभूत किंमत २४०० रुपये प्रति क्विंटल असतानाही, मका कमी भावात खरेदी केला जात होता. शासनाने यापूर्वी ८ केंद्रे उघडली होती, परंतु ती अनेक आदिवासी शेतकऱ्यांसाठी गैरसोयीची ठरली होती. त्यामुळे राहू आणि सेमाडोह येथे नवीन केंद्रे सुरू करण्याची मागणी करण्यात आली, जी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी तात्काळ मान्य केली. ही केंद्रे लवकरच कार्यान्वित होतील, असे त्यांनी सांगितले.
मका खरेदीच्या मुद्द्याव्यतिरिक्त, मेळघाट आणि अचलपूर परिसरातील आदिवासी व इतर समाज बांधवांच्या शिक्षण आणि आरोग्याच्या दयनीय स्थितीवरही चर्चा झाली. शालेय पोषण आहार आणि अंगणवाडीतील मुलांना पुरविल्या जाणाऱ्या आहारातील अडचणी सोडवण्याचेही यावेळी मान्य करण्यात आले. या संवाद बैठकीला एटीसी जितेंद्र चौधरी, मेळघाटचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, सहकार विभागाचे सुधीर मानकर, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, आदिवासी विकास राज्य सहकारी विभागाचे आमटे, वनखात्याचे अधिकारी तापस, महिला व बालविकास विभागाचे डेप्युटी सीईओ विलास मरसाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी आणि ‘खोज’ संस्थेचे प्रमुख ॲड. बंड्या साने यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी उपस्थित होते.
