![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी संदीपान भुमरे आणि त्यांच्या समर्थकांवर अत्यंत गंभीर आरोप करत थेट आव्हान दिले आहे. ज्याला अब्रू असते, तो अब्रू नुकसानीचा दावा करतो; मी अशा दाव्यांना फुकटची भीकही घालत नाही, अशा शब्दांत त्य
.
अंबादास दानवे म्हणाले की, समृद्धी महामार्गाचे 1150 कोटी रुपये ढापण्याचा प्रयत्न झाला आहे. एक साधा ड्रायव्हर एवढी हिंमत करूच शकत नाही. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, 1985 मध्ये जन्मलेल्या व्यक्तीचा 1971 चा हिबानामा कसा असू शकतो? तसेच, एखादे हिंदू कुटुंब मुस्लिमाला हिबानामा (भेटपत्र) कसे करून देऊ शकते, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. सोमवारी मी कलेक्टरांकडे जाणार आहे, तो हिबानामाच मी देतो तुम्हाला मग त्यांनी सांगावे हा मी नाहीच म्हणून. त्यामध्ये त्यांचे आधार कार्ड सुद्धा असतील.
माझ्याकडे प्रकरणाचे ‘खमंग मटेरियल’
भुमरेंनी पाठवलेल्या नोटीसवर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, मी ती नोटीस वाचली देखील नाही, थेट वकिलांकडे पाठवली आहे. उलट त्यांनी मोठा दावा दाखल करावा, म्हणजे कोर्टात पैसे भरताना ते पैसे कुठून आले हे तरी उघड होईल. माझ्याकडे या प्रकरणाचे ‘खमंग मटेरियल’ असून मी कोर्टात त्याची वाट पाहत आहे.
त्या ड्रायव्हरच्या भावावर 376 चा गुन्हा
या प्रकरणात पोलिसांनी भुमरेंच्या ड्रायव्हरला पाठीशी घातल्याचा आरोप दानवेंनी केला. तसेच, वकील संदीप गव्हाणे हे लुटमारीचे धंदे करतात आणि बापू भुमरे त्यांच्याकडेच बसलेले असतात, असा दावाही त्यांनी केला. भुमरेंचा जो चालक सध्या चर्चेत आहे त्याच्या भावावर कुठेतरी 376 चा गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुन्ह्यात मेरे पास 100-200 कोटी है अब मेरा कोई कुछ नही कर सकता असे असल्याचे माझ्या कानावर आले आहे. FIR मी काढतो आहे.
नोटीसीला मी उत्तर देणार
अंबादास दानवे म्हणाले की, मी जो आरोप केला तो केवळ भुमरेंचा ड्रायव्हर आहे इतका माझा आरोप आहे. माझ्या आरोपाचे केवळ त्यांनी उत्तर द्यावे. त्यांचा ड्रायव्हर आहे हे त्यांनी कबुल केले आहे. त्यांचा जन्म 1985 शीचा आहे मग हिबानामा 1971 होतो कसा हा माझा प्रश्न होता. दुसरा प्रश्न हिंदू कुटुंब मुस्लीमाला हिबानामा कसे करुण देते? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. गट नंबरचा जा विषय आहे मी त्यांच्यात म्हटलंय की आधीचा गट नंबर 174 आणि आताचा सर्वे नंबर 89 असे माझ्या पत्रात स्पष्ट आहे. ते दुसरेच काही तरी बोलत आहेत. तिथे तो गट नंबर नाही हे मला माहिती आहे. तुमचा तालुका तिकडे आहे पण माझे या परिसरात रोज जाणे येणं आहे. मला सर्व माहिती आहे. दिशाभूल करणे अतिशय चुकीचे आहे. नोटीसीला मी उत्तर देणार पण हे काही कोर्टात जाणार नाही. भुमरेंनी आधीही काही केले नाही. त्यांच्या मुलाला मारले नाही पडले? किती वाजता पडले? कसे पडले? कुठे ॲडमिट केले? MLC झाली का? पूर्ण माहिती घेतली का? पोलिस तिथे गेले होते का? हे सर्व माहिती घेतली पाहिजे. त्यांना काय झाले मला सर्व माहिती आहे.
अजितदादांच्या अपघाताबद्दल चौकशी व्हावी
अंबादास दानवे म्हणाले की, अजित पवारांच्या अपघाताबद्दल चौकशी व्हावी ही सर्व महाराष्ट्राची मागणी आहे.ती लवकरात लवकर व्हावी आणि सत्य समोर यावे ही आमची इच्छा आहे. तर खारगे समितीचा अहवाल येत असेल आणि त्यामध्ये पार्थ पवार जर नसेल तर त्या अहवालाला काहीही अर्थ नाही. असे अहवाल शेवटच्या टप्प्यात होत असतात. राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीची चर्चा सुरू असून होळीनंतर चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.
