आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठीची जबाबदारी युवा पिढीने स्वीकारावी:कृषी आपत्ती व्यवस्थापन शिबिरात कुलगुरूंचे आवाहन‎



राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर अर्थात “आव्हान- चान्सलर्स ब्रिगेड’ चा समारोप डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झाला. या शिबिरात विद्यार्थी-विद्यार्थ िनींनी आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे गिरवले. युवकांचा देश म्हणून संपूर्ण विश्वावर छाप पाडलेल्या

.

सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण होणे, कौशल्य व नेतृत्व गुण विकसित होणे, अचानक घडणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवनिर्मित घटनांमुळे होणारी जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान व सामाजिक अव्यवस्था टाळण्यासाठी ते सज्ज असावेत, यासाठी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ आपत्तीपूर्व तयारी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराच्या समारोप सत्रात एनडीआरएफ, पुणेचे कमांडंट दीपक तिवारी, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य शिवराम घोडके, विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. देवानंद पंचभाई, संचालक संशोधन डॉ. श्यामसुंदर माने, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता डॉ. अरविंद सोनकांबळे, निरीक्षण समितीचे सदस्य डॉ. सतीश कोलते, डॉ. हेमंत वऱ्हातकार, डॉ. रामेश्वर कोठावळे, डॉ. मिलिंद काळे, वित्तीय व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. तानाजी चौगुले यांनी सहभाग नोंदवला.

असा होता दिनक्रम : शिबिराचा दिनक्रम निश्चित करण्यात आला होता. यात सकाळी योगा, प्राणायाम, कवायतीनंतर रुग्णाची काळजी, अत्यवस्थ रुग्णांना सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवण्याचे कौशल्य अवगत करण्यात आले. दुपारी सत्रात कृतीयुक्त प्रशिक्षण देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे आपत्कालीन परिस्थितीत व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन झाले. त्यानंतर लँड स्लाइड रेस्क्यू ऑपरेशन, वैयक्तिक आणि परिवाराची आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा, सामुदायिक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन, भूकंप, वीज पडणे, चक्रीवादळ, भूस्खलन, जंगलातील वणवा आदी प्रसंगी काय करावे आणि काय, नाही त्यावर कृतीयुक्त मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्यांचा सत्कार व फिरत्या चषक पटकावलेल्या विद्यापीठांची नावे जाहीर करण्यात आली. सर्वोत्तम विद्यापीठ फिरता चषक- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी फिरता चषक- डॉ. नितीन कुमार दादासाहेब माळी (नंदुरबार), कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, डॉ. नीता भानुदास बोचे (बुलडाणा), संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांना देण्यात अले. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक फिरता चषक दोन विद्यार्थी, दोन विद्यार्थिनींना देण्यात आले. यात निसर्ग प्रल्हाद सावंत (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर), अथर्व शरद ताठे (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ), आर्या भालचंद्र कदम (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक), प्रणाली विजय टाले यांचा समावेश होता. बेस्ट प्रोसेशन रोटेटिंग ट्रॉफी मुंबई विद्यापीठ मुंबई अंतर्गत जिल्हा रायगड यांना प्रदान करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *