![]()
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे, या उद्देशासाठी मिशन आरंभ राबवण्यात येत आहे. या मिशनचा भाग म्हणून, रविवारी जिल्हाभरात शिष्यवृत्तीपूर्व सराव चाचणी परीक्षा शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आली. या परीक्षेला १५ हजार ७५३ विद्यार्थी उपस्थित राहिले. पाचवी व आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. या परीक्षेच्या धरतीवर मिशन आरंभ अंतर्गत ५ सराव चाचणी परीक्षांचे नियोजन आखण्यात आले. ही चाचणी परीक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. ही पाचवी सराव चाचणी परीक्षा जिल्हाभरातील १७० केंद्रांवर रविवारी (१ फेब्रुवारी) घेण्यात आली. त्या परीक्षेसाठी पाचवीतील १३ हजार ६२९ तर आठवीतील ९३९ विद्यार्थी उपस्थित होते. तर पाचवीतील १०५७ तर आठवीतील १२८ विद्यार्थी गैरहजर राहिले. या परीक्षेचा निकाल ९ फेब्रुवारीला जाहिर होणार आहे. शिक्षण विभागच पाठवतोय पालकांच्या प्रतिक्रिया मिशन आरंभ अंतर्गत झालेल्या शिष्यवृत्ती पूर्वी परीक्षेनंतर, जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने प्रेस नोट जारी करण्यात आली. त्यात पालकांची प्रतिक्रिया, विद्यार्थ्यांची व शिक्षकांची प्रतिक्रिया प्रशासनानेच घेऊन पाठवली आहे. त्यामुळे तीनही प्रतिक्रियेत सराव परीक्षेचे कौतूक करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 170 केंद्रांवर 15,753 विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती पूर्व परीक्षा
