![]()
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या Learjet 45 विमान अपघाताच्या तपासाला वेग आला असून, दुर्घटनेनंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधून काढण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता एअरपोर्ट अथॉरिटी, पोलिस फॉरेन्सिक
.
हा भीषण अपघात बुधवारी सकाळी सुमारे 8.45 वाजता घडला. दिल्लीस्थित VSR Ventures कंपनीद्वारे चालवले जाणारे Learjet 45 विमान बारामती विमानतळावर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करत असताना धावपट्टीच्या बर्याच आधी कोसळले. या दुर्घटनेत 66 वर्षीय अजित पवार, त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी, एक सहाय्यक तसेच कॉकपिटमधील दोन्ही वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक यांचा जागीच मृत्यू झाला. अजित पवार मुंबईहून सकाळी 8 वाजता निघाले होते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामतीत चार प्रचार सभांना संबोधित करण्याचा त्यांचा कार्यक्रम होता.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, विमानाने सकाळी 8.18 वाजता बारामती विमानतळाशी संपर्क साधला होता. त्या वेळी वैमानिकांना हवामानाची माहिती देण्यात आली आणि लँडिंग ‘पायलटच्या निर्णयावर’ करण्याचा सल्ला देण्यात आला. वैमानिकांनी वाऱ्याची दिशा आणि दृश्यमानतेबाबत विचारणा केली असता, दृश्यमानता सुमारे 3,000 मीटर असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विमानाने रनवे 11 वर अंतिम उतरणीची माहिती दिली, मात्र काही क्षणांतच धावपट्टी दिसत नसल्याचे सांगत ‘गो-अराउंड’ करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या प्रयत्नानंतर विमानाने पुन्हा अंतिम उतरणीचा प्रयत्न केला. एटीसीकडून धावपट्टी दिसत असल्याची खात्री विचारण्यात आली आणि ती मिळाल्यानंतर सकाळी 8.43 वाजता लँडिंगची परवानगी देण्यात आली. मात्र, याच टप्प्यावर एक गंभीर त्रुटी समोर आली. लँडिंग क्लीअरन्स मिळाल्यानंतर वैमानिकांकडून आवश्यक असलेला ‘रीडबॅक’म्हणजे परवानगी समजल्याची पुनःपुष्टी देण्यात आली नाही. पुढच्याच मिनिटाला, 8.44 वाजता, एटीसीने रनवे 11 च्या थ्रेशहोल्डजवळ आगीच्या ज्वाळा पाहिल्याचे मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
DGCAमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये वैमानिकांचे शेवटचे शब्द ओह शिट… असे ऐकू आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे बारामती विमानतळावरील ग्राउंड कंट्रोल हे शहरातील दोन खासगी विमान प्रशिक्षण संस्थांमधील रेडबर्ड एव्हिएशन आणि कार्व्हर एव्हिएशन पायलट कॅडेट्सकडून सांभाळले जाते. हाच या उड्डाणाचा जमिनीवरील संपर्क बिंदू होता. कॅप्टन सुमित कपूर यांचा 15 हजार तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव होता, तर सहवैमानिक शांभवी पाठक यांनी सुमारे 1,500 तासांचे उड्डाण केले होते.
दरम्यान, तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. संबंधित Learjet विमानात सॅटेलाइट-आधारित आधुनिक सुरक्षा प्रणाली बसवण्याची अंतिम मुदत केवळ 28 दिवसांनी चुकली होती. खराब हवामानात लँडिंगसाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरू शकली असती, असे तज्ज्ञांचे मत आहे. आता ब्लॅक बॉक्समधील माहितीच्या विश्लेषणातून हवामान, मानवी चूक, तांत्रिक बिघाड की समन्वयातील त्रुटी नेमके कोणते कारण या भीषण दुर्घटनेला जबाबदार आहे, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या तपासातून बारामती अपघाताचे खरे सत्य लवकरच समोर येणार आहे.
