![]()
येथील नगरपालिका निवडणुकीत भाजपाचे नुकसान करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करावे, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष यतीन कदम व आमदार राहुल आहेर यांच्याकडे केली आहे.
.
नगरपालिकेची निवडणुकीत पक्षातील ज्येष्ठ व अनुभवी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त दोन जागेसाठी युती करून भारतीय जनता पार्टीचे नुकसान करणाऱ्या मंडल अध्यक्ष संजय सानप व व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांना पदमुक्त करावे, अशी मागणी निवेदनात म्हटले आहे. दत्तराज छाजेड यांना पक्षाने एबी फॉर्म दिलेला असताना पक्षातील कोणालाही विश्वासात न घेता निवडणुकीतून माघार घेतली. याची पक्षाने नोंद घ्यावी व त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सजन कवडे, जिल्हा चिटणीस डॉ. राजेंद्र आहेर, माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप थोरात, तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, अभय निकम यांच्या स्वाक्ष्ऱ्या आहेत.
