![]()
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका प्रभागात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पाणीटंचाई, रखडलेली विकासकामे, अर्धवट रस्ते, ड्रेनेजचा प्रश्न आणि रात्री-अपरात्री होणारा पाणीपुरवठा या मूलभूत समस्यांवरून सत्ताधारी शिंदे गटाची शि
.
शिवसेनेचे उमेदवार बाबाभाऊ तायडे यांनी माजी नगरसेवकांवर विकासकामांकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत, पाणी योजनेचे “तीनतेरा” झाल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर खोटी आश्वासने, जातीय राजकारण आणि सत्तेसाठी हिंदुत्त्वाशी तडजोड केल्याचा आरोप केला आहे. उमेदवार पळून जाणे, बाहेरून उमेदवारी “आयात” केल्याचे आरोप, आणि पाणी प्रश्नावरून उभे राहिलेले आंदोलनाचे इशारे यामुळे निवडणूक रणधुमाळी अधिक तीव्र झाली आहे.
६५ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या प्रभागात टँकरवर अवलंबून असलेला पाणीपुरवठा, बंद पथदिवे आणि अस्वच्छतेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अशा परिस्थितीत मतदार कोणाच्या शब्दांवर विश्वास ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिव्य मराठी डिजिटलचा लढाई मनपाची मुद्दा नागरिकांच्या शो ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिंदे-ठाकरे शिवसेनेमध्ये झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर आता या प्रभागातील समस्या सोडवल्या जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खैरेंनी पाणी योजनेचे तीन तेरा वाजवले
शिवसेनेचे उमेदवार बाबाभाऊ तायडे म्हणाले की, आमच्य प्रभागात समस्यांचा डोंगर आहे. माजी नगरसेवकांनी आमच्या परिसराचे वाटोळे केले आहे.आमच्याकडे ड्रेनेज, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची टाकी नाही असे एक ना अनेक प्रश्न आहेत.परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.आमच्या परिसरात शिवसेनेच्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक कामे केली आहेत, या कामांवर आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. नगरसेवकांचे काम होते ते त्यांनी केले नाही उलट आमच्या परिसराला तांडा म्हणून संबोधले यामुळे जनतेमध्ये त्यांच्याविरोधात रोष आहे. त्यांना दांडा दाखवण्याचे काम आम्ही करणार आहोत. सत्तेशिवाय शहानपण नसते, आमच्याकडे आमदार आमचे, खासदार आमचे, मंत्री आमचे आहेत त्यामुळे आम्ही कामे करू शकत आहोत. चंद्रकांत खैरे यांनी पाणी योजनेचे तीन तेरा वाजवले.
हिंदुत्त्वासाठी केलेली युती यांनी सत्तेसाठी तोडली ठाकरे गटाचे उमेदवार कुणाल राऊत म्हणाले की, आमच्या प्रभागात अनेक समस्या आहेत या वॉर्डात सत्ताधारी अनेक कामे केल्याचा दावा करतात ते ऐकले की एकच शब्द आठवतो, फेको, फेको आणि फेको लपेटो अशी परिस्थिती झाली आहे.याचे दोन्ही आमदार विधानसभेच्यावेळी काढावर निवडून आले आहेत. ते पण जातीच्या गणितामध्ये तफावत नसती तर हे दोन्ही आमदार पराभूत झाले असते. आम्ही पाण्यासाठी रक्त घ्या पण पाणी द्या असे आंदोलन संजय शिरसाट यांच्या घरासमोर करणार होतो त्यांनी आंदोलनच होऊ दिले नाही. हिंदुत्त्वासाठी केलेली युती यांनी सत्तेसाठी तोडली, काय उपयोग तुम्ही हिंदुत्त्वाच्या नावाने एकत्र येतात आणि युती तोडतात. ही लोकं जातीच्या नावाने राजकारण करतात, शहर पूर्णपणे भकास झाले आहे. आमच्याकडे पाणी येण्याची वेळ निश्चित नाही, त्यामुळे महिलांना खूप त्रास होतो. यांना प्रचाराला लोकं भेटत नाही. रस्ते यांनी केलेले नाहीत, ते केंद्र सरकारच्या निधीतून झाले आहेत. पाण्याचे आश्वासन दिले पण योजना पूर्ण करू शकलेले नाही. मनपा आयुक्तांनी पैसे लुटले आहेत दोन महिन्यात ते पळून जाणार आहे. ही कुणाची माणसं आहेत? रस्त्याचे उद्घाटन ६ महिन्यापूर्वी झाले आणि निवडणुकीवेळी काम करत मतदान मिळवायचे हे काम सत्ताधारी करत आहेत. तर जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे काम सुद्धा सरकारकडून सुरू आहे. हे सर्व ईडीला घाबरुन पळून गेलेली लोकं आहेत.
सचिन खैरे हे गुलमंडी प्रभागात राहतात
ठाकरे गटाचे विलास संभाहारे म्हणाले की, आमच्या प्रभागात रात्री २ वाजता किंवा ३ वाजता येते. त्या वेळेत बदल करणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांकडून अनेक वेळा पाण्याची डेडलाइन देण्यात आली आहे. मग पाणी का आले नाही केवळ पाइपलाइन टाकून ठेवल्या आहेत. सचिन खैरे हे गुलमंडी प्रभागात राहतात त्यामुळे त्यांनी तिथून उमेदवारी घेतली. ठाकरे गटाचे कार्यकर्ते सक्षम आहेत ते पक्षासाठी काम करू शकतात. केवळ २० टक्के काम राहिले शिवसेनेच्या उमेदवार प्रतिभा जगताप म्हणाल्या की, माझ्या मतदारसंघात पाहिला तर केवळ पाण्याची समस्या आहे, इतर कोणतीही समस्या नाही. पाण्याचा विषय आमच्या प्रभागात आहे तो येणाऱ्या ४ ते ५ महिन्यात संपणार आहे.यामुळे महीला खूश आहेत. आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे, ८० टक्के कामे झालेली आहेत, आता आमच्यासाठी केवळ २० टक्के काम राहिलेले आहे. सरकारने सर्व गोष्टी पुरवल्या आहेत. आम्ही जनतेचे काम करत आहोत मागील दोन निवडणुकीत आम्ही विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ. लोकांना पाणी न मिळण्यासाठी जुने नगरसेवक कारणीभूत आहेत, ते उबाठाचे नगरसेवक होते. पाण्याची योजना कुणी खाल्ली हे पाहणं महत्त्वाचे आहे. आमचे सरकार आल्यापासून अनेक कामे झाली आहेत, आता पाणी येणार आहे. मे महिन्यात पाणी येणार आहे, आम्ही खोटे बोलणारी लोकं नाहीत. उबाठा गटाला नेताच उरलेला नाही.
पालकमंत्री-मंत्र्यांनी शहरासाठी काहीही केलेल नाही
ठाकरे गटाचे प्रमोद दुथडे म्हणाले की, मनपा आल्यापासून तिच्यावर शिवसेना-भाजपची सत्ता आहे.त्यावेळी आम्ही एक ते दोन दिवसांनी पाणी देत होतो. पण हे सराकर आल्यापासून ८ ते १० दिवसांनी पाणी येते. बेरात्री पाणी येत असल्याने आरोग्यावर परिणाम होत आहे. यासाठी नगरसेवक काहीच करु शकत नाहीत. पालकमंत्री असो की मंत्री त्यांनी शहरासाठी काहीही केलेल नाही. त्यांचे शहरामकडे लक्षच नाही. नगरसेवकांना जास्त काही निधी मिळत नसतो. पण नगरविकास मंत्री यांच्यामुळे प्रभागाचे नुकसान झाले आहे. बेरात्री येणारे पाणी आमच्या काळात देणार नाही.टँकर मुक्त प्रभाग करण्याचा आमचा हेतू राहणार असून दिवसा पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. काही लोकांनी माझ्यावर आरोप करणाऱ्या लोकांना माहिती नसेल की मी गेली २५ वर्षे लोकांची सेवा करत आहे, आमदारकी लढलो हे खरे पण पक्षाचा झेंडा म्हणजेच आमचा उमेदवार आहे.
या आहेत प्रभागाच्या समस्या
हिमायतबाग, पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, भावसिंगपुरा, भीमनगर, कानिफनाथ कॉलनी आदी भागांमध्ये मूलभूत समस्या अद्यापही कायम आहेत. अर्धवट काम केलेले रस्ते, जुनाट ड्रेनेजलाइनमुळे सांडपाणी रस्त्यावर येणे, गलिच्छ नाले व डासांचा उपद्रव यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. या प्रभागातील अद्यापही टँकरने पाणीपुरवठा होतो. अनेक ठिकाणी तर टँकरदेखील उपलब्ध नसल्याने नागरिकांना बोअर आणि विहिरीच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.या परिसरात ६५ हजार नागरिक राहतात. मात्र, असे असले तरी घंटागाडी आठवड्यात तीन ते चार वेळेसच येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. प्रभागात १८ घंटागाड्या आहेत. मनपा आणि स्मार्ट सिटीने रस्त्याच्या कामासाठी मोठा खर्च केला. यामुळे रस्त्याचे जाळे वाढले. मात्र, अंतर्गत रस्त्याची कामे अद्याप बाकी असल्याने नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग, फेरीवाल्यांचा ताबा आणि स्ट्रीट लाइट बंद असल्याने रात्री अपघात व गुन्ह्यांचा धोका वाढल्याचे स्थानिकांन सांगितले.
अशी आहे प्रभागाची व्याप्ती
पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, भावसिंगपुरा, जयसिंगपुरा, हनुमान टेकडी, हिमायतबाग, विद्युत कॉलनी, गणेश कॉलनीचा काही भाग, चाऊस कॉलनी, विद्युत कॉलनी, साफल्यनगर, पेठेनगर, भीमनगर भागश:, कानिफनाथ कॉलनी, कुतुबपुरा, पराक्रम कॉलनी.
एकूण मतदार । 35 हजार 602
