![]()
विधान परिषदेच्या सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे अधिवेशन लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी असते. परंतु, इकडे सभागृहात चर्चा कमी आणि तिकडे पायऱ्यांवर, मीडियासमोर आणि शिव्याशाप देतात. विरोधक हा गोंधळलेला आणि भरकटलेला विरोधी पक्ष असल्याचे पाहायला मिळाले. बहुमत असले आमच्याकडे तरी सुद्धा लोकशाहीत विरोधी पक्षातल्या सदस्यांचे म्हणणे ऐकून घेणारे आहोत. अशी चर्चा व्हायला पाहिजे होती, पण ती झाली नाही. त्यात खिटे नाटे आरोप करण्यात आले. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, पावसाचे मोठे संकट आपल्यावर आले होते. शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले आहे. परंतु, सुदैवाने एक जुलैपासून पाऊस सक्रिय झाला आणि आपण सुटकेचा निश्वास सोडला. आता पावसाच्या संदर्भात आपण आढावा घेत आहोत. अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला. काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कमी झाला ही चिंतेची बाब आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याकडे देखील आपले लक्ष आहे. परंतु, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न असेल, जनतेच्या सुरक्षेचा असेल, या सगळ्या विषयांवर बोलताना तथ्य बोलणे अपेक्षित होते. परंतु, विरोधासाठी केवळ विरोध करू नये. पावसाचे राजकारण करण्यात आले. वस्तुस्थिती आहे की पावसामुळे नुकसान झाले आहे. संकटाला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज एकनाथ शिंदे म्हणाले, या ज्या काही घटना घडल्या आहेत, त्या वेदना देणाऱ्याच आहेत. मृतांच्या नातेवाईकांच्या प्रती सहवेदना आहे. गेल्या 25 वर्षात 15 टक्क्यांनी वाढला आहे. कमी कालावधीत जास्त पाऊस पडत आहे. मुंबईत देखील 25 टक्के पाऊस एका आठवड्यात पडला आहे. 6 जुलैला अतिवृष्टी झाली. यात जनजीवन विस्कळीत होणे हे स्वाभाविक आहे. सरकारने या संकटाला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज ठेवले आहे. वारकऱ्यांच्या वाटेतील विघ्न दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध आपल्या लाडक्या वारकऱ्यांच्या वाटेतील विघ्न दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पंढरपूरमध्ये आपण चोख व्यवस्था केली आहे. तिथे आयसीयूची देखील सुविधा करण्यात आली आहेत. चंद्रभागेच्या पटांगणात देखील आपण नियोजन केले आहे. एयर अॅम्ब्युलेन्स देखील यावेळेस आपण तिथे सज्ज ठेवली आहे. वारकऱ्यांना जे काही आपण दरवर्षी नियोजन करतो, यात सरकार कुठेही कमी पडणार नाही. शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडले जाणार नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क हा आपल्या बळीराजाचा आहे. शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. हा विश्वास आपण या ठिकाणी बाळगा. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात कसे बदल होतात, हे देखील आपल्याला बघावे लागते. सरकारने पायाभूत सुविधा केल्या आहेत.
सभागृहात चर्चा कमी, पायऱ्यांवरच शिव्याशाप जास्त:एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर साधला निशाणा; म्हणाले- विरोधी पक्ष गोंधळलेला आणि भरकटलेला
