Sangli Flood Diversion Project Phase One Soon; Devendra Fadnavis Launches BJP Civic Campaign | ‘फ्लड डायव्हर्शन’चा पहिला टप्पा लवकरच: शहरांना पुरापासून मिळणार संरक्षण अन् दुष्काळी भागाला पाणी; मुख्यमंत्र्यांनी फोडला भाजपच्या प्रचाराचा नारळ – Maharashtra News



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगलीत भाजपच्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी सांगली व कोल्हापूर सारख्या शहरांचे पुराच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी फ्लड डायव्हर्शन प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार असल्य

.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्या निमित्ताने मी सांगलीतून भाजपच्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदा सांगलीत आले होते. तेव्हा ते म्हणाले होते, सांगली सर्वात चांगली. त्यामुळे मी ठरवले की, महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ मुंबईत सायंकाळी होईल. पण तत्पूर्वी, सांगलीतून भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याचा निर्णय आम्ही घेतला. मागच्या महापालिका निवडणुकीत मी सांगलीत आलो होतो. तेव्हा काही आश्वासने दिली होती. तसेच जनतेला भाजपच्या ताब्यात महापालिका सोपवण्याचे आवाहनही केले होते. त्यानंतर महापालिकेची सूत्रे भाजपच्या हातात आली. त्यानंतर आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

सांगली व कोल्हापुरात आलेल्या महापुरात अमाप नुकसान झाले. त्यानंतर आम्ही फ्लड डायव्हर्जनचा पहिला प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेतला. 2 टप्प्यांत होणाऱ्या या प्रकल्पावर 4 हजार कोटींचा खर्च होणार आहे. त्याचा सांगलीतील पहिला पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी 591 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पुराचे पाणी शहरात न येता पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळी भागात वळवण्यात येईल. यामुळे एकीकडे आपल्या शहरांना पुराच्या पाण्यामुळे संरक्षण मिळेल आणि दुसरीकडे दुष्काळी भागाला त्या पाण्यामुळे शेतकऱ्याला जिवनदान मिळेल.

आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. याबाबतीत आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. आज महाराष्ट्रातील 50 टक्के लोकसंख्या शहरात राहते. 6 कोटी लोकं 40 हजार गावांत राहतात आणि 6 कोटी लोकं 400 शहरांत राहतात. 6 कोटींपैकी साडेचार कोटी लोकं सांगलीसारख्या 29 शहरांत राहतात. त्यामुळे शहरांत राहणाऱ्या लोकांच्या जिवनात सकारात्मक बदल घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *