Navnath Ban Attacks Thackeray Alliance BMC Election Fear Politics | ठाकरे बंधुंची युती ‘प्रीतीसंगम’ नाही तर ‘भीतीसंगम’: नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघात, पैसे वाटले असल्यास पुरावे देण्याचे आव्हान – Maharashtra News



ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला ‘प्रीतीसंगम’ असे गोंडस नाव दिले असले, तरी प्रत्यक्षात हा ‘प्रीतीसंगम’ नसून मुंबई महापालिका गमावण्याच्या धास्तीने झालेला ‘भीतीसंगम’ आहे, अशी बोचरी टीका भाजपचे माध्यमप्रमुख नवन

.

संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केल्यानंतर भाजपने त्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. नवनाथ बन म्हणाले की, “दोन भाऊ भीतीपोटी एकत्र येत आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईचा जो विकास झाला, तो पाहून मुंबईकर महायुतीच्या पाठीशी उभे आहेत. मुंबई महापालिकेत आपला पराभव निश्चित असल्याची जाणीव झाल्यामुळेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याला प्रीतीसंगम म्हणून नावाची बदनामी करू नका.”

राज ठाकरेंची ६० जागांवर बोळवण करण्याचा उबाठाचा प्रयत्न

या युतीमधील जागावाटपाच्या तिढ्यावरही नवनाथ बन यांनी भाष्य केले. “राज ठाकरे यांना फक्त ६० जागा देऊन त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न ‘उबाठा’ गटाकडून सुरू आहे. मात्र, राज ठाकरे ६० जागांवर समाधानी होतील असे वाटत नाही. मला मिळालेल्या माहितीनुसार, मनसे किमान १०० जागांची मागणी करत आहे. त्यामुळे ही युती उद्याच होईल की नाही, याची खात्री नाही. मुळात ही युती झाली तरी १६ जानेवारीला मुंबई महापालिकेवर भाजप आणि महायुतीचाच भगवा फडकेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुरावे देण्याचे संजय राऊतांना आव्हान

नगरपालिका निवडणुकीत महायुतीने पैशांची उधळपट्टी केल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपांचा नवनाथ बन यांनी समाचार घेतला. “फुकटची बडबड करणे ही संजय राऊतांची जुनी सवय आहे. जर खरोखरच कोट्यवधी रुपये उधळले गेले असतील, तर राऊतांनी एखादा कच्चा चिठ्ठा, व्हिडिओ क्लिप किंवा ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर सादर करावी. केवळ हवेत आरोप करण्यापेक्षा पुरावे द्यावेत.संजय राऊत देखील निवडणुकीत कशापद्धतीने पैशांची उधळपट्टी करत आहेत? कशाप्रकारे भ्रष्टचारा महाराष्ट्रात केला? हे जनतेला ठाऊक आहे,” असे आव्हान त्यांनी दिले.

जनता ‘देवाभाऊ’ आणि शिंदेंच्या पाठीशी

कालच्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे की, महाराष्ट्रातील जनता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आहे. महायुतीला मिळालेले हे यश म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांची नांदी असून, मुंबईतही भाजपचाच विजय होईल, असा दावा नवनाथ बन यांनी यावेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *