इराणला छोटासा शत्रू म्हणून हिणवण्याच्या अहंकारात अमेरिकेला अखेर आपलेच पाऊल मागे घ्यावे लागले. जगात दादागिरीची भाषा करणाऱ्या अमेरिकेला आपला सर्वात ताकदवान युद्धनौका USS Abraham Lincoln माघारी बोलवावी लागली, हीच त्यांच्या दाव्यांची खरी पोलखोल आहे. जवळपास ६०० हून अधिक अमेरिकन सैनिक ठार झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. आम्ही काहीच शिल्लक ठेवत नाही म्हणणारी महासत्ता आज स्वतःच बचावात्मक भूमिकेत दिसते.आपण इथे रंगोत्सव साजरा करत असताना, पश्चिम आशियात अक्षरशः रक्ताची होळी पेटलेली आहे. बातम्यांनुसार इराणने सुमारे ५०० क्षेपणास्त्रे डागली, तर अमेरिकेने २०१८ मध्ये मोठा पलटवार करत १७ जहाजे नष्ट केल्याचा आणि २००० ठिकाणी हल्ले केल्याचा दावा केला. Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) चे जनरल जब्बार यांनी तेलाच्या समुद्री मार्गांवर नियंत्रण घेतल्याची घोषणा केली. परिणामी, तेलाच्या किमती ८० डॉलरच्या पुढे गेल्या. जागतिक अर्थव्यवस्था हादरली, पण महासत्तांना त्याची पर्वा नाही.Fox News च्या वृत्तानुसार Riyadh येथील अमेरिकन MBC कंपाउंडमधील सीआयएस स्टेशनवर ड्रोन हल्ला झाला. हे ठिकाण अमेरिकेच्या गुप्त कारवायांचे प्रमुख केंद्र मानले जाते. इथूनच मध्यपूर्वेतील राजकारणाचे धागेदोरे हलवले जातात, असे बोलले जाते. पण जेव्हा त्याच केंद्रांवर हल्ले होतात, तेव्हा अपराजेय असल्याचा दावा करणाऱ्यांची हवा निघते.

इराणने Tel Aviv वरही हल्ल्याचा दावा केला. इराणचे सर्वोच्च नेते Ali Khamenei यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला तात्पुरते नेतृत्व देण्यात आल्याची चर्चा आहे. युद्ध संपेपर्यंत ठोस नेतृत्व आवश्यक असल्याचे इराणी लष्कराने स्पष्ट केले. मात्र यावरून इराणमध्ये पारदर्शक लोकशाहीपेक्षा परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात, हेही स्पष्ट होते.Tehran मधील Mehrabad International Airport उडवून लावल्याच्या बातम्या समोर येत आहेत. इस्रायलची हवाई संरक्षण व्यवस्था भेदल्याचे इराणचे दावे आहेत. सोशल मीडियावर फिरणारे व्हिडिओ मिसाईल हल्ल्यांचे आहेत; मात्र नेमके किती जीवितहानी झाली, याबाबत दोन्ही बाजूंकडून स्पष्ट आकडे नाहीत. म्हणजेच आम्ही त्यांचा पूर्ण सत्यानाश केला म्हणणारे अमेरिका आणि इस्रायलही सत्य लपवत आहेत, अशी शंका निर्माण होते.Make America Great Again चा नारा देणारे Donald Trump जगाला वेठीस धरून आपलीच आवृत्ती सत्य म्हणून रेटत आहेत. पत्रकार परिषदांमधून ते Barack Obama यांच्यावर आरोप करतात की त्यांनी इराणला अब्जावधी डॉलर्स दिले. कधी म्हणतात इराण २५ वर्षांपासून अणुबॉम्ब तयार करत आहे, तर कधी सहा महिन्यांत बॉम्ब बनेल, असे भाकीत करतात. या परस्परविरोधी विधानांतून नेमके कोण खोटे बोलत आहे, हा प्रश्न अधिक तीव्र होतो.जर इराणचे हल्ले दिसत असतील आणि अमेरिकन-इस्रायली हल्लेही दिसत असतील, तर नुकसान फक्त एका बाजूचेच होते आणि दुसऱ्यांना काहीच होत नाही, हे मान्य करण्यासारखे आहे का? की माहितीचे युद्ध हेच आजचे खरे रणांगण आहे?जसे भारताच्या राजकारणात आजचे नेते जुन्या नेत्यांवर चिखलफेक करतात, तसेच जागतिक स्तरावरही आरोप-प्रत्यारोपांची मैफल रंगली आहे. पण या सगळ्या सत्तासंघर्षात सामान्य नागरिकांचे रक्त सांडते आहे, अर्थव्यवस्था कोसळते आहे, आणि जग अराजकतेकडे ढकलले जात आहे.आज आपण होळीच्या शुभेच्छा एकमेकांना देत आहोत; पण पश्चिम आशियात पेटलेली रक्ताची होळी विझावी, युद्धाचा हा वेडेपणा थांबावा आणि निरपराधांचा बळी जाऊ नये, यासाठी प्रार्थना करण्याची वेळ आली आहे. सत्ता, सूड आणि अहंकार यांच्यापलीकडे जाऊन मानवतेचा विचार करण्याची हीच खरी कसोटी आहे.

Post Views: 3
