अर्धापूर (प्रतिनिधी)- येथील पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल अर्धापूर येथील सात विद्यार्थ्यांनी कठीण मानली जाणारी शिष्यवृत्तीची परीक्षा उत्तम गुणाने पास केली आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी कोणत्याही ट्युशन शिवाय केवळ शाळेतील मार्गदर्शन आधारे ही परीक्षा उत्तीर्ण केली
अभिमन्यू गोविंद भालेराव, नंदनी अर्जुन गोरे, श्रद्धा चंद्रशेखर वापटकर , क्रांती गजानन कांबळे , अक्षरा रवी विरकर , धीरज रमेश सूर्यवंशी , अजिंक्य धम्मपाल सरोदे
ह्या यशवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सय्यद जाकीर अली, फरिहा बदर इनामदार, रेखा ठोंबरे, ज्योती पावडे, रेखा सरोदे, शीला कारमुंगे, जावेद शेख, प्रणिता भालेराव, संघमित्रा पोपलवार, शमशाद रहमानी, अनिल सुरवसे, दिगंबर मांजरमकर यांचे कौतुक शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे, गुणवंत वीरकर, शेख साबेर, मंजूर अली, गटशिक्षणाधिकारी लोकदाजी गोडबोले, केंद्रप्रमुख विकास चव्हाण, मुख्याध्यापक डॉ शेख एम डब्ल्यू एच, यांनी केले आहे समाजाच्या सर्व स्तरातून यशवंतांचे कौतुक होत आहे, गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांना यथायोग्य मार्गदर्शन करणारे गुरुजन सर्वांचे मनस्वी मनस्वी अभिनंदन.
Post Views: 8
