खासदार बळवंतराव वानखडे यांची संसदीय मैत्री गटात निवड:जागतिक स्तरावर भारताचे स्थान प्रभावी करण्यासाठी सरकारचा पुढाकार




अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे यांची संसदीय मैत्री गटाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांनी ही निवड केली असून, जागतिक पातळीवर भारताचे स्थान अधिक प्रभावी करण्यासाठी सरकारने हा गट स्थापन केला आहे. या गटाच्या माध्यमातून विविध देशांमध्ये दौरे करून भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे. हे गट परराष्ट्र धोरणाला संसदीय पातळीवर गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. याच अंतर्गत खासदार वानखडे लवकरच मोरोक्को देशाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांतील राजनैतिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि संसदीय सहकार्य अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा होणार आहे. या निवडीमुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाला संसदीय पातळीवर अधिक गती मिळेल, तसेच महाराष्ट्रातील जनतेचा आवाज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *