चणकापूरमधून आवर्तन, पाण्यात अडकल्या यात्रेकरूंच्या दुचाकी‎:पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याबाबत केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष‎




चणकापूर धरणातून रब्बीचे आवर्तन‎सोमवारी सोडण्यात आले. धरणाच्या‎पायथ्याशी असलेल्या चणकापूर‎गावाची यात्रा सुरू असल्याने व‎यात्रेकरूंनी प्रवाह मार्गात पार्किंग‎केलेल्या दुचाकींभोवती पाणी जाऊन‎दोन दुचाकी वाहून बाजूला फेकल्या‎गेल्याने एकच गोंधळ उडाला. सुदैवाने‎यामध्ये कुठलीही जीवित वा वित्तहानी‎झाली नसल्याने संकट टळले. मात्र‎ अचानक झालेल्या या प्रकारामुळे‎नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.‎ चणकापूर गावात सुरू असलेल्या‎चणकेश्वर महादेवाच्या यात्रेनिमित्त‎धरण परिसरात मोठी गर्दी झाली होती.‎यावेळी पाटबंधारे विभागाने रब्बी‎हंगामातील आवर्तन सोडण्यात येणार‎असून नागरिकांनी अवैधरित्या पार्किंग‎केलेली वाहने काढण्यासाठी‎वेळोवेळी सूचना केल्या होत्या. मात्र‎तरीही काही नागरिकांनी सूचनांकडे‎दुर्लक्ष केल्याने व पाणी सोडले तरी‎वाहनांपर्यंत येणार नाही, या‎विश्वासाने वाहने काढली नाहीत.‎म्हणून हा प्रसंग घडला. मात्र अचानक‎झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये‎भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.‎काही वेळ परिसरात गोंधळ उडाला.‎स्थानिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी‎धाव घेतली.‎ वाहनांपर्यंत पाणी येणार नाही, या‎ विश्वासाने वाहने तशीच उभी ठेवली‎ चणकापूर धरणातून रब्बी हंगामासाठी आवर्तन‎सोडण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून सुचना‎आल्याने पाणी सोडण्यात आले. यावेळी प्रवाह‎क्षेत्रात असलेल्या नागरिकांना अवैधरित्या पार्किंग‎केलेली वाहने काढण्याच्या सूचना दिल्या. मात्र‎काही नागरिकांनी सूचनांकडे दुर्लक्ष केले व पाणी‎वाहनांपर्यंत येणार नाही या विश्वासाने प्रवाहातील‎वाहने तशीच उभी ठेवली. यावेळी धरणातून‎सुटलेल्या पाण्याच्या वेगात दोन दुचाकी वाहून‎बाजूला पडल्या. यावेळी नागरिकांची गर्दी झाल्याने‎गोंधळ निर्माण झाला. मात्र कुठलीही जीवित वा‎वित्तहानी नाही. नागरिकांनी सहकार्य करावे.‎ – अक्षय काळे, उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *