बोरगाव बाजारच्या मुख्य रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात:रस्त्यावरील दुकानांवर तसेच घरांवर साचले धुळीचे थर, डांबरीकरणाची मागणी‎



सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजारच्या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिसरात अवजड वाहनांच्या रहदारीमुळे धुळीचे प्रमाण वाढले असून त्यामुळे नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना श्वसनविकार, अ‍ॅलर्

.

बोरगाव बाजार हे बाजारपेठेचे गाव असून येथे शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीयीकृत बँका, सेतू, तलाठी-मंडळ अधिकारी कार्यालये असल्यामुळे येथे १० ते १५ खेड्यांच्या नागरिकांची, विद्यार्थ्यांची कायम वर्दळ असते. येथील या धुळीच्या रस्त्यामुळे त्यांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यांवरून दररोज मोठ्या संख्येने अवजड वाहने, ट्रक, कंटेनर, डंपर व मालवाहू वाहने जात असल्याने सतत धूळ उडत आहे. या मार्गाचा वापर स्थानिक रहिवासी, विद्यार्थी, दुचाकीस्वार आणि पादचारी रोज करतात. मात्र, रस्त्यावरील असमानता खड्डे, डांबरीकरण असूनही कच्चा रस्तासदृश बनलेल्या या रस्त्यावर सतत वाहतुकीचा भार यामुळे हा मार्ग धुळीचा पट्टा बनला आहे. सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी तर परिस्थिती अधिकच बिकट होते.

दुकाने, घरांवर धुळीचे थर

रस्त्यालगत असलेले दुकाने, घरांवर धुळीचे थर जमलेला असतो. येथील नागरिकांनी वारंवार रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करीत असताना कोणतीही ठोस पावले बांधकाम तसेच संबंधित ठेकेदाराकडून उचलली गेलेली नाहीत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी धूळ साचल्यामुळे परिसरातील दुकाने, घरे आणि वाहनांवर सतत धुळीचा थर बसतो. या समस्येमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धूळ दीर्घकाळ राहिल्यास फुप्फुसांचे आजार, अ‍ॅलर्जी धूळ सदृश वातावरणात दीर्घकाळ राहिल्यास फुप्फुसांचे आजार, दमा, अ‍ॅलर्जी आणि मुलांमधील श्वसनविकार वाढण्याचा धोका असतो. विशेषतः लहान मुलांमध्ये याचे परिणाम लवकर दिसतात. त्यामुळे रस्त्यावर नियमित पाण्याची फवारणी करणे, डांबरीकरण करणे व वाहतुकीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. -डॉ. विवेक अधिकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *