अमरावतीची तीन बालनाट्ये राज्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत:22 व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत जिल्ह्याला तीन पुरस्कार




२२ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या विभागीय प्राथमिक फेरीत अमरावती जिल्ह्यातील बालनाट्य कलावंतांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अमरावती आणि अचलपूर येथील तीन नाटकांनी तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला असून, या पाचही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. यावर्षी अमरावती केंद्रात विक्रमी ६७ बालनाट्यांचे सादरीकरण झाले. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार, अमरावती येथील अ.ब.क नाट्य मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या ‘आदिबांच्या बेटावर’ या नाटकास तृतीय पारितोषिक मिळाले. भारवी कला अकादमी, अचलपूरच्या ‘अबोलांचे बोल’ या नाटकास चतुर्थ पारितोषिक, तर कलाविष्कार बहुउद्देशीय संस्था, अमरावतीच्या ‘बुद्धाची गोष्ट’ या नाटकास पाचवे पारितोषिक जाहीर झाले. अकोला केंद्रातून सादर झालेल्या विश्वास प्रतिष्ठानच्या ‘दप्तर’ या नाटकाला प्रथम, तर जे.आर.डी. टाटा स्कूल अँड एडूलॅब, खडकी (अकोला) च्या ‘वाढदिवस’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक मिळाले. इतर वैयक्तिक पुरस्कारांमध्ये, दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक प्रतिभा कोकमारे (नाटक: दप्तर), द्वितीय कल्याणी गेडाम (नाटक: बी पॉझिटिव्ह) आणि तृतीय रितेश महल्ले (नाटक: झाडवाली झुंबी) यांना मिळाले. प्रकाश योजनेसाठी प्रथम पारितोषिक प्रतिभा फोकमारे (नाटक: वाढदिवस), द्वितीय दीपक नांदगावकर (नाटक: आदिबांच्या बेटावर) आणि तृतीय परियल बंड (नाटक: झाडवाली झुंबी) यांना प्रदान करण्यात आले. नेपथ्यासाठी प्रथम पारितोषिक अनिकेत देशमुख (नाटक: बी पॉझिटिव्ह), द्वितीय रवींद्र काळपांडे (नाटक: आनंदाचे झाड) आणि तृतीय शांता झाडे (नाटक: तळमळ एका अडगळीची) यांना मिळाले. रंगभूषेसाठी प्रथम स्नेहशील गणवीर (नाटक: तळमळ एका अडगळीची), द्वितीय प्राची गायकवाड (नाटक: शेपूट राहिलं) आणि तृतीय संदीप शिंदे (नाटक: अबोलांचे बोल) यांना घोषित करण्यात आले. याशिवाय, वेशभूषेचे प्रथम पारितोषिक जया शिरभाते (नाटक: उजबोगा), द्वितीय रेयांश बाभुळकर (नाटक: डमी) आणि तृतीय पल्लवी कपिले (नाटक: आदिबांच्या बेटावर) यांना मिळाले. संगीत दिग्दर्शनासाठी प्रथम प्राची गायकवाड (नाटक: ती एकाकी का?), द्वितीय अनुराग वानखडे (नाटक: अनाथ) आणि तृतीय देवाशीष खोपे (नाटक: शेपूट राहिलं) यांना घोषित करण्यात आले. उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक अंकुश जैन (नाटक: दप्तर) आणि अन्वी वाहाने (नाटक: ती एकाकी का?) या दोन कलावंतांना मिळाले. अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे सृष्टी कटारे (नाटक: दप्तर), राखी मिना (नाटक: जाईच्या कळ्या), परि ढोले (नाटक: क्षितीजा पलीकडे), अनुष्का ढोबळे (नाटक: वाढदिवस), पारुल लोखंडे (नाटक: देवाला पत्र), आयांश कपिले (नाटक: आदिबांच्या बेटावर), अद्वैत तराळ (नाटक: अनाथ), अनय तिळकीट (नाटक: बुद्धाची गोष्ट), अन्वेश भुजाडे (नाटक: स्वयंपूर्ण) आणि अर्णव जयस्वाल (नाटक: डमी) यांना प्रदान करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks